Sanjay Raut: 'हे बरं दिसत नाही...', राज ठाकरेंचा फोन अन् मातोश्रीवर चर्चा; कसं असेल मोर्चाचे नियोजन?

Raj Thackeray Uddhav Thackeray News: हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल, असं संजय राऊत म्हणालेत. याबाबतच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचा खुलासा केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: मुंबईमध्ये हिंदी सक्तीविरोधातील निघणाऱ्या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची महत्त्वाची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. 5 जुलै रोजी निघणाऱ्या या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे सहभागी होतील, असं म्हणत हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल, असं संजय राऊत म्हणालेत. याबाबतच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचा खुलासा केला आहे.

काय म्हणालेत संजय राऊत?

"काल मराठी भाषा कृती समितीचे दिपक पवार आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या चर्चेत ७ तारखेला सर्व मराठी भाषा प्रेंमींना आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. मराठीचा विषय असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला.मी त्याठिकाणी उपस्थित होतो. त्याचवेळेला राज  ठाकरेंकडे काही सरकारचे लोक गेले होते. आमची पत्रकार परिषद सुरु  असतानाच राज ठाकरे यांनी ६ तारखेच्या मोर्चाची घोषणा केली,"  असं संजय राऊतांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या मोर्चाची कल्पना आम्हाला मोतश्री वर असताना नव्हती. मी मातोश्रीवर निघाल्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला. त्यांनी अशी भूमिका आहे की आपण सात तारखेला आंदोलन सुरु करायचे ठरवले आहे, मी आत्ताच सहा तारखेंची घोषणा केली आहे. मराठीच्या भूमिकेसाठी दोन वेगळे मोर्चे निघणे बरे दिसत नाही. हे मोर्चे एकत्र निघाले तर बरं होईल. त्याचा जास्त प्रभाव पडेल. त्यानंतर मी तात्काळ मातोश्रीवर परत गेलो आणि राज ठाकरेंचा संदेश सांगितला. त्यावर उद्धव ठाकरे आणि कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला.

Advertisement

Hindi Controversy: राज- उद्धव ठाकरेंचा मुंबईत 5 जुलैला एकत्र मोर्चा, हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधु एकटवले!

दरम्यान, "आपण सात तारीख यासाठी घेतली होती की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे. राज्यभर आषाढीचा उत्सव असल्याने हा मोर्चा चर्चेत येणार नाही. त्यामुळे आपण सात तारखेला घेतला होता. मात्र एकत्रित करणार असून तर माझी काही हरकत नाही. आपण सर्व यामध्ये सहभागी होऊ. त्यानंतर मी राज ठाकरेंना त्यांचा संदेश सांगितला आणि त्यांनीही पाच तारखेला मोर्चा निघेल असं जाहीर केले. मोर्चाची वेळ आणि मार्ग याबाबत आम्ही चर्चा करु. असं राऊतांनी स्पष्ट केले. 

Advertisement