शरद सातपुते: शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये लिहलेल्या रोखठोकमधील सदरावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी कामाख्या देवीला रेड्याचे बळी चढवले, असा घणाघात संजय राऊत यांनी केला होता. यावरुनच आता शिंदे गटही आक्रमक झाला असून संजय शिरसाट यांनी राऊतांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत संजय शिरसाट?
"आम्ही म्हशीचा बळी दिला का रेड्याच्या बळी दिला हे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले हे पाहिलं असतं,तर पक्ष टिकला असता,अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी खासदार संजय राउतांना टोला लगावला आहे," सांगलीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
तसेच "कामाख्या देवीला गेलो हा आमचा पिक्चर सर्व जगाने पाहिला आहे त्या ठिकाणी म्हशीचा का रेड्याचा बळी दिला हे पाहायला संजय राऊत कुठून आला होता? हे आम्हाला माहीत नाही पण ते मूर्खासारखे बडबडतात,आणि पश्चाताप करण्यापेक्षा टीका करण्यामध्ये ते धन्यता मानतात. त्यामुळे आज देखील उबाठामधून आउटगोइंग सुरूच आहे त्यांनी बडबड तशीच ठेवावी," असा टोला देखील मंत्री संजय शिरसाठ यांनी लगावला आहे.
दरम्यान, माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नाने मिरजमधील दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे लोकार्पण पार पडले आहे. सर्व सामान्यांची मुले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार असून राज्यातील 125 वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे.. अशी माहितीही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वसतिगृह लोकार्पण वेळी दिली.