जाहिरात

Satara News: बावधन गावचं ‘शैक्षणिक बगाड’, शाळा वाचवण्यासाठी टॅक्स फ्री, ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!

Satara Bavdhan Village News: गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत जर विद्यार्थांनी प्रवेश घेतला तर त्याच्या कुटुंबाची एक वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायत माफ करणार आहे.

Satara News: बावधन गावचं ‘शैक्षणिक बगाड’, शाळा वाचवण्यासाठी टॅक्स फ्री, ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!

राहुल तपासे, सातारा:  गावातील शाळा वाचवायचीय… पण कशी? इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत गावशाळा हरत चालल्यात, पण सातारा जिल्ह्यातील बावधन गावान एक क्रांतिकारी निर्णय घेतला गेला आहे. सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं बावधन गाव शिक्षणासाठी आता एक वेगळी दिशा दाखवत आहे. घरपट्टी माफ करून मुलांना गावशाळेत प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत पुढे तर शाळेतच ‘एआय' शिकवण्याची तयारीही दर्शवली आहे.  जाणून घ्या काय आहे ही सरकारी शाळा वाचवण्यासाठीची ग्रामपंचायतीची लढाई?

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सातारा जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल हे आहे बावधन गाव. सुमारे 15 हजार लोकसंख्या असलेले बावधन महाराष्ट्रातील सर्वात मोठं बगाड याच गावच प्रचलित. मात्र या गावान शिक्षणासाठी एक ऐतितहासिक निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकित ठरलंय की गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत जर विद्यार्थांनी प्रवेश घेतला तर त्याच्या कुटुंबाची एक वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायत माफ करणार आहे.

बावधन गावात पुर्वी चार जिल्हापरिषदेच्या शाळा होत्या. मात्र आताफक्त एक शाळा उरली आहे आणि त्यातही फक्त 366 विद्यार्थी शिल्लक आहेत.त्यामुळे शाळा बंद पडायच्या उंबरठ्यावर असताना ग्रामपंचायतीचा हा निर्णय एक प्रकरचा शैक्षणिक संजीवनी ठरत आहे. शहरातल्या इंग्रजी शाळांचे आकर्षण वाढत चालले आहे. सर्वांना परवडेल असे नाही. म्हणून गावातील शाळा टिकवणे महत्वाचे आहे, असे मत ग्रामपंचायत समिती सदस्य तिनाजी कचरे यांनी व्यक्त केले आहे.

ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad: वाल्मिक कराडच्या सुटकेवर 'या' दिवशी होणार युक्तीवाद, कोर्टात आज काय काय घडलं?

याचबरोबर  बावधन गावाने आता पुढच्या ग्रामसभा ठरावात आणखी एक क्रांतिकारी पाऊल उचलण्याच ठरवले आहे. शाळकरी मुलांना शाळेतच एआय अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या एआयच्या माध्यमातून विद्यार्थांना शेती कशी करता येईल याचेही धडे शाळेतच दिले जातील. आणि शेतीचा हा संगम भविष्यात गावातल्या शेतीला नवसंजीवनी देणारा ठरू शकणार आहे.

दरम्यान, घरपट्टी माफ होणार आहे आणि शाळेत एआय शिकायला मिळणार म्हणून पालकवर्ग या जिल्हापरिषदेच्या शाळेंकडे वळू लागतील मात्र विषय दुसरा की शाळेतल्या शिक्षकांच काय? शिक्षकांबद्दल जी राज्यभर चर्चा सुरु आहे तीच चर्चा बावधनमध्येही आहे. गावाने निर्णय घेतला मात्र आता खरा कस शिक्षकांचा लागणार आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com