जाहिरात

Big News: शनिशिंगणापूर ट्रस्टींचा मोठा निर्णय! एका झटक्यात 167 कामगारांना घरी पाठवले, कारण काय?

शनेश्वर देवस्थान ट्रस्ट मंडळ 1963 साली स्थापन झालं आहे. अहिल्यानगरच्या धर्मदाय आयुक्त मार्फत ट्रस्टचे कामकाज चालतं.

Big News: शनिशिंगणापूर ट्रस्टींचा मोठा निर्णय! एका झटक्यात 167 कामगारांना घरी पाठवले, कारण काय?

प्रसाद शिंदे 

अहिल्यानगर जिल्ह्यासह देशांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थाने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. या देवस्थानमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय देवस्थानच्या वतीने घेण्यात आलेला आहे. देवस्थान ट्रस्टने एका झटक्यात 167 कामगारांना घरचा रस्ता दाखवला आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात कामगारांना काढून टाकल्यामुळे त्यामागचे कारण नक्की काय आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काही दिवसापूर्वी शनि देवाच्या चौथर्‍यावर विशिष्ट समाजाच्या लोकांच्या हाताने काम करून घेतल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर  त्या समाजाच्या कर्मचाऱ्यांना हटवण्यासंदर्भात हिंदू संघटनांनी मंदिर ट्रस्टींवर दबाव देखील आणल्याचं बोललं जात आहे. त्याच अनुषंगाने आज कुठे तरी ट्रस्टींनी वेगळा एक निर्णय घेतल्याचं दिसून आलं आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Beed News: 13 वर्षांची मुलगी, 30 वर्षांचा नवरा, एकाच मांडवात दोघांशी लग्न, पुढे जे घडलं ते...

शनेश्वर देवस्थान ट्रस्ट मंडळ 1963 साली स्थापन झालं आहे. अहिल्यानगरच्या धर्मदाय आयुक्त मार्फत ट्रस्टचे कामकाज चालतं. मंदिर परिसरामध्ये असलेल्या विविध विभागांमध्ये काम करण्यासाठी कामगारांची आवश्यकता असते. यासाठी कामगार घेण्याच्या अधिकार हे मंदिर विश्वस्त मंडळाला आहे. कामावर घेतलेल्या कामगारांनी कामाबाबत कामचुकार पण केला. गैरवर्तन केलं तर त्यांना कामावरून काढण्याचा सर्वस्वी अधिकार हा देवस्थान  मंडळाचा आहे.

ट्रेंडिंग बातमी - sonam Raghuvanshi: 'बेवफा'सोनम! एकदा नाही, दोनदा नाही, तर 'इतक्या' वेळा केला होता राजाला मारण्याचा प्रयत्न

आज शनिश्वर देवस्थान मंडळांनी एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये कामामध्ये अनियमितता आणि शिस्तीचे पालन न केल्याच्या कारणावरून 167 कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा सकल हिंदू समाजाने दबाव आणला होता. त्यावर बोलताना ट्रस्टी म्हणाले की आमच्यावर कोणाचाही दबाव नसून जे कर्मचारी कामांमध्ये काम चुकारपणा करतात त्यांना कामावरून काढण्यात आलं आहे. या संदर्भात विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी ही माहिती दिली आहे. मुस्लीम समाजा बरोबर इतर समाजाचे ही कर्मचारीही यात आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com