सौरभ वाघमारे, सोलापूर: सोलापूरमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील एका सोसायटीमध्ये तरुण- तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहरातील कर्णिक नगर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूआधी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये आम्ही जिवनाला कंटाळून आयुष्य संपवत असल्याचं म्हटलं आहे.
नक्की वाचा - Crime News: दोघांवर अत्याचाराचे आरोप, पण भलतेच सत्य समोर, महिलेलाच झाली 7 वर्षांची शिक्षा
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर शहरातील कर्णिक नगर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत एकाच घरात गुरुवारी सायंकाळी तरुण-तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रोहित भिमू ठणकेदार (वय २३) असे तरुणाचे तर अश्विनी विरेश केशापुरे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. आम्ही जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, आम्ही दोघे भाऊ बहीण,असा उल्लेख आहे. कर्णिक नगर परिसरातील एका बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर दोघेही एकाच दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. परंतु या दोघांनी टोकाचा पाऊल का उचलले? त्यांच्यातील नाते काय होते? याबाबत अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी करत आहेत. या घटनेची नोंद सिव्हील पोलिस चौकीत झाली आहे.