Mazi Ladki Bahin Yojana : 'आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नकोत', 37 महिलांचा अर्ज तर तिघींनी संपूर्ण रक्कम केली परत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कित्येक महिलांनी अर्ज करीत निधी बंद करण्याची मागणी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

महायुती सरकारसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पुरविल्या जाणाऱ्या निधीवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. गेल्या अनेक महिन्यांमध्ये या योजनेतील लाभार्थ्यांची फेरपडताळणी केली जात आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांनीदेखील या योजनेअंतर्गत लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे येत्या काळात या योजनेची अधिक कडक स्वरुपात चाचणी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान वाशिममध्ये कित्येक महिलांनी लाडकी बहिणीचा लाभ नाकारला आहे, तर तीन सरकारी महिलांनी आतापर्यंत घेतलेली रक्कम परत केल्याचंही समोर आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात नियमितपणे हप्तेजमा झाले आहेत. मात्र, जिल्ह्यातील 37 महिलांनी स्वतःहून लाभ नाकारत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज केला आहे. तसेच, सरकारी कर्मचारी असलेल्या 3 लाभार्थी महिलांनी आतापर्यंत मिळालेली संपूर्ण रक्कम शासनाला परत केली आहे. दरम्यान, राज्यभरात पात्र अर्जदारांची फेरपडताळणी सुरू असून वाशिम जिल्ह्यातील 14,245 लाभार्थी महिलांनी लाडकी बहीण योजनेसह अन्य शासकीय योजनांमधूनही निधी प्राप्त केल्याचं निष्पन्न झालं आहे.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Rachita Juyal : जबरदस्त कामगिरी करणाऱ्या IPS रचिता जुयाल यांचा राजीनामा, नोकरीच्या 10 वर्षात VRS साठी अर्ज

वाशिम जिल्ह्यातील 3,93,337 महिलांचा लाडकी बहीण योजनेत समावेश आहे. योजना जाहीर झाल्यानंतर 17 ऑगस्ट 2024 पूर्वी जिल्ह्यातील पात्र महिलांच्या खात्यात पहिल्या हप्त्यात 1,500 रुपये जमा झाले होते. त्यानंतर टप्याटप्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच हप्त्याचे 7,500 तर त्यानंतर तीन हप्त्याचे 4,500 असे एकूण 13,500 आतापर्यंत महिलांना मिळाले आहेत. जिल्ह्यातील 37 महिलांनी स्वत:हून जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करून आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नकोत, असे जाहीर केले. तर सरकारी कर्मचारी असलेल्या तीन महिलांनी अर्ज करून लाभ बंद करण्याची मागणी करण्यासोबतच आतापर्यंत खात्यात जमा झालेली संपूर्ण रक्कम शासनाला परत केल्याची माहिती प्राप्त झाली.

Advertisement