Sanjay Rathod: मंत्री संजय राठोड यांचा एकाच अधिकाऱ्यावर वरदहस्त! कुशिरेंवरील मेहेरबानीचे गौडबंगाल काय?

राठोड यांची मेहरबानी यामागे काही मोठे अर्थपूर्ण व्यवहार आहेत का? असा आरोपच  विरोधकांकडून केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची जलसंधारण विभागातील एकाच अधिकाऱ्यावर कृपादृष्टी का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. सुनिल कुशीरे या एकाच अधिकाऱ्यावर महत्त्वाच्या तीन खात्यांच्या जबाबदाऱ्या दिल्याने ही याबाबतच्या चर्चा आता प्रशासकीय क्षेत्रासह राजकीय वर्तुळातही रंगत असून जलसंधारण खात्यातील काही विशिष्ट अधिकाऱ्यांना राठोड यांची मेहरबानी यामागे काही मोठे अर्थपूर्ण व्यवहार आहेत का असा आरोपच  विरोधकांकडून केला जात आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुनिल पांडुरंग कुशीरे या अधिकाऱ्यावर जलसंधारण मंत्री एवढे मेहरबान का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. कारण जलसंधारणा विभागात जवळ जवळ 7 वर्षे कनिष्ठ असताना वरिष्ठ पदाचा कार्यभार आणि वरिष्ठ असताना कनिष्ठ पदाचा कार्यभार कुशिरे यांच्याकडे आहे. कुशिरे यांच्याकडे  व्यवस्थापकीय संचालक, मृद व जलसंधारण महामंडळ, छत्रपती संभाजीनगर  अशी तीन महत्त्वाची पदे आहेत. जलसंधारण नाव खात्यातील सर्वेसर्वा कुशिरे हेच मानले जातात.

Advertisement

 जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची इतकी मेहरबानी एकाच अधिकार्‍यांवर का? इतका मोठा विश्वास फक्त एकाच अधिकाऱ्यावर दाखवण्याचं कारण काय यामागे वेगळे गौडबंगाल आहे का? अशीच जोरदार चर्चा जलसंधारण खात्यात सुरू आहे जलसंधारणामध्ये जल शिवारसारखे महत्त्वाचे कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 2019 कार्यकाळात केले. यामुळे राज्यातील अनेक दुष्काळी भागात पाणी मिळवून शेत शिवारामध्ये हिरवीगार झाली. आता मागील दोन आठवड्यामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणाची तब्बल 200 पेक्षा जास्त काम रद्द केली. यामागे प्रामुख्याने अनियमितता तसेच निकृष्टपणा असे अनेक मुद्दे उपस्थित झाल्यानेच रद्द केल्याचे म्हटलं जाते.

राजा रघुवंशीच्या मृत्यूची भविष्यवाणी करणाऱ्या पंडितजींनी केले आणखी अनेक धक्कादायक खुलासे

संजय राठोड यांच्या जलसंधारण विभागांमध्ये काही विशिष्ट अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाल देत मुदतवाढ दिली आहे. काही विशिष्ट अधिकाऱ्यांवरच राठोड यांची मेहरबानी का? याची चर्चा आता जलसंधारण खात्यात सुरू झाली आहे. जलसंधारण खात्यातील काही विशिष्ट अधिकाऱ्यांना राठोड यांची मेहरबानी यामागे काही मोठे अर्थपूर्ण व्यवहार आहेत का? असा आरोपच  विरोधकांकडून केला जात आहे. राठोड यांच्या बेलगाम कार्यपद्धतीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाप लावणार का? याकडे आता लक्ष आहे.

Advertisement

 नक्की वाचा : Raja Raghuvanshi Murder : राजाच्या हत्येनंतर सोनमनं 17 दिवस काय केलं? वाचा Inside Story )