Rain Alert : मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची रिपरिप सुरु आहे. सोमवारपासून अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांसह घाट माथ्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर कोकणातील काही ठिकाणी, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आणि घाट माथ्यावर विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, याठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.
(नक्की वाचा- देशद्रोही ज्योतीसोबत पाकिस्तानची सफर, आणखी एक युट्यूबर तपास यंत्रणांच्या रडारवर)
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर ,धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळीवाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांना या काळात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडं पडणे, विजेचे खांब कोसळून नुकसान होणे आणि वीज प्रवासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.