Ajit Pawar: कर्जमाफी लांब राहीली! गरिब शेतकऱ्यांना कर्जाबाबत अजित पवारांचा अजब सल्ला, म्हणाले....

एकीकडे कर्ज माफीचे आश्वासन देणारे सरकार दुसऱ्या बाजूला अजब सल्ला देत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

देशातील शेतीला अजूनही 'मान्सूनचा जुगार' म्हटले जाते. शेतकरी आपल्या कष्टाने पीक घेतो, परंतु अनेकदा यासाठी त्याला कर्ज घ्यावे लागते. नैसर्गिक आपत्ती किंवा पीक नुकसानीमुळे अनेकदा शेतकरी घेतलेले कर्ज फेडू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारे कर्जमाफीचे निर्णय घेतात. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर गरीब शेतकऱ्यांसाठी एक 'अनोखा' सल्ला दिला आहे. ज्यामुळे चर्चा सुरू झाली आहे शिवाय नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कारण एकीकडे कर्ज माफीचे आश्वासन देणारे सरकार दुसऱ्या बाजूला अजब सल्ला देत आहे.

बारामती येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हवन-पूजन कार्यक्रमात अजित पवार यांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले शेतकऱ्यांनी कर्ज वेळेवर फेडण्याची सवय लावली पाहिजे. अजित पवार म्हणाले, "जेव्हा बँक तुम्हाला शून्य टक्के व्याजाने पैसे देते, तेव्हा ते वेळेवर फेडण्याची सवय लावली पाहिजे. त्यांनी कर्जमाफीच्या वारंवार होणाऱ्या घोषणांवर भाष्य केले. ते म्हणाले, "तेच मोफत, तेच मोफत आणि... तीच माफी आणि तोच उपाय. असं ते यावेळी म्हणाले. 

नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

शरद पवारांनी  एकदा कर्जमाफी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी एकदा कर्जमाफी केली होती. जेव्हा उद्धव ठाकरे आणि मी सरकारमध्ये होतो तेव्हाही कर्जमाफी केली. आता पुन्हा महायुतीत आम्ही म्हटले की आपल्याला निवडणुकीत जिंकायचे आहे, माफ करू... माफ करू... पुन्हा माफ करू... लोक काय म्हणतात? तुम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. तुम्ही वचन दिले होते, आताच करा, पण त्यासाठी आज तर काही हजार कोटी रुपये लागतील असं ते म्हणाले. 

नक्की वाचा - Marriage News: 6 सख्ख्या भावा बहिणींनी आपसात केलं लग्न, त्यामागचं कारण ऐकून पायाखालची वाळू सरकेल

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने आपल्या जाहीरनाम्यातील वचन पूर्ण करत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जमाफीची पद्धत आणि निकष ठरवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे, जी यावर आढावा घेईल आणि 1 एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर, 30 जूनपूर्वी या अहवालाच्या आधारावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल.

Advertisement