विशाल पाटील
राज्यात राजकीय संस्कृती होती. मात्र आता राज्यात,देशात ईडी आणि सीबीआयचा गैर वापर केला जात आहे, असं सांगत माजी गृहमंत्री अनिल देशमुख भाजपवर जोरजदार टीका केली आहे. जेलमध्ये असताना आपला छळ केला गेला. कशा पद्धतीने त्रास दिला यावर त्यांनी भाष्य केले आहे. हुकूमशाही विरोधी सभा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. भाजप कशा पद्धतीने राजकारण करत आहे हे ही त्यांनी या निमित्ताने सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनिल देशमुख यांची वेगवेगळ्या आरोपांमुळे ईडी आणि सीबीआयची चौकशी चालू होती. मात्र या चौकशी वेळी माझ्या नातीला सुद्धा चौकशीत कशा पद्धतीने समाविष्ट केले गेलं याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली. ईडी- सीबीआय अशा यंत्रणांनी माझ्या घरी आणि इतर 170 ठिकाणी धाड टाकली. माझी 6 वर्षांची नात आहे. तिला अधिकाऱ्यांनी कॅडबरी चॉकलेट देऊन 20 मिनिट चौकशी केली. माझ्या पत्नीला देखील याचा मोठा त्रास झाला. माझ्या पत्नीला कॅन्सर झाला आहे. मी त्यावेळी तडजोड केली असती तर चित्र वेगळ असतं. पण की तसं केलं नाही. असं देशमुख यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Plane crash:विमान अपघात रोखण्यासाठी पक्षांची दिशा सरकार बदलणार? पण कशी?
यावेळी त्यांनी आपली संजय राऊत यांच्या बरोबर जेलमध्ये कशी भेट झाली हे ही त्यांनी सांगितलं. जेल मधील काही गोष्टींचा उलगडा त्यांनी भाषणात केला आहे. माझी आणि राऊत यांची जेलमध्ये भेट व्हायची. संजय राऊत यांना घरचा डबा होता. पण मला घरचा डबा खाण्यासाठी परवानगी दिली नव्हती. आपला एक प्रकारे छळ सुरू होता. पण आपण सहन करत होता. आपण संघर्ष करत होतो. आपण भाजपच्या या दबावा पुढे झुकलो नाही असं ही ते यावेळी म्हणाले.
मी एका न्यायाधिशाचं नाव सांगत नाही, त्यांनी सांगितल होत की महात्मा गांधी जेलचा डबा खात होते. मग अनिल देशमुख यांना घरचा डबा का? असा सवाल सुद्धा केला होता. संजय राऊत यांना जेव्हा जेव्हा भेटायला जायचो, तेव्हा ते काहीतरी लिहत बसायचे. मी बोलायचो काय लिहताय. ते मला म्हणायचे उद्याचा सामना वाचा. आतमध्ये त्यांनी त्यांची व्यवस्थित यंत्रणा लावली होती. संजय राऊत यांच्या आग्रहावरून मी पुस्तक लिहायला घेतलं. संजय यांच्या आग्रहाखातर मी लेखक झालो असं देशमुख यावेळी म्हणाले.