काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त करणाऱ्या लेखाच्या विरोधात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखरूपात प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं – “ज्यांना जनता नाकारते, तेच जनादेश नाकारतात.”
फडणवीस यांनी लेखात दिल्यानुसार, 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र, शिवसेनेने जनादेशाचा अपमान करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. राहुल गांधींवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसला जनता वारंवार नाकारते आहे, म्हणूनच आता ते ईव्हीएम यंत्रांवर शंका घेत लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
नक्की वाचा - NCP News: आषाढी एकादशीपर्यंत राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड घडणार? 'या' नेत्याच्या संकेतामुळे एकच खळबळ
मुख्य मुद्दे...
• महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित होणं आता नित्याचं झालं आहे.
• ईव्हीएम विरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
• राहुल गांधी हे पराभव स्वीकारू न शकणारे नेते आहेत, असं फडणवीस म्हणाले.
• काँग्रेस ज्या ठिकाणी निवडणूक जिंकते, तिथे ईव्हीएम योग्य असतात का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
फडणवीस म्हणाले...
“आम्ही लेखाचं उत्तर लेखानेच देऊ. खोटं वारंवार बोलून ते खरं होत नाही. देशातील जनता सत्य ओळखते. महाराष्ट्राने वेळोवेळी भाजपला भरभरून पाठिंबा दिला आहे आणि २०२४ मध्ये पुन्हा एकदा तो स्पष्ट दिसून आला.” शेवटी राहुल गांधींना उद्देशून फडणवीस यांनी लिहिलं, “जनादेशाचा आदर करा. जनता सारं काही पाहत आहे. आता बहाणे चालणार नाहीत – उत्तरदायित्व ठरवले जाईल.”