'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीसांनी दिलं उत्तर

Rahul Gandhi on Maharashtra Election : भारतीय जनता पक्षाने (भाजप) विजय मिळवण्यासाठी 'मॅच-फिक्सिंग' केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Rahul Gandhi on Maharashtra Election : राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
मुंबई:

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) विजय मिळवण्यासाठी "मॅच-फिक्सिंग" केली असल्याचा आरोप त्यांनी केला. मागच्या वर्षी झालेल्या या निवडणुकीत भाजपा,  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) यांचा समावेश असलेल्या महायुतीने 288 विधानसभा जागांपैकी 235 जागा जिंकल्या. भाजपाने एकट्याने 132 जागा जिंकल्या, जी राज्यातील त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पाच सुत्री मॉडेल

राहुल गांधी यांनी  'द इंडियन एक्सप्रेस'मध्ये लिहिलेल्या एका लेखात दावा केला आहे की, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) राज्यातील लोकशाही प्रक्रियेत गडबड करण्यासाठी पाच-सूत्री मॉडेलचा वापर केला.

पायरी 1: निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठीच्या पॅनलमध्ये फेरफार करणे
पायरी 2: मतदार यादीत बनावट मतदार जोडणे
पायरी 3: मतदारांची संख्या वाढवणे
पायरी 4: भाजपला जिथे जिंकण्याची गरज आहे, तिथेच बोगस मतदान करणे
 पायरी 5: पुरावे लपवणे

असे राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखाच्या कटआउटसोबतच्या एका पोस्टमध्ये लिहिले.

2024 च्या निवडणुकीत, भाजपने प्रचंड विजय मिळवला, तर याउलट, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांनी स्थापन केलेली विरोधी महाविकास आघाडी (MVA) केवळ 50 जागांवर मर्यादित राहिली.

Advertisement

'मी लहानसहान फसवणुकीबद्दल बोलत नाही, तर आपल्या राष्ट्रीय संस्थांना काबीज करून औद्योगिक स्तरावर केल्या गेलेल्या हेराफेरीबद्दल बोलत आहे,' असे गांधी यांनी त्यांच्या लेखात लिहिले आहे.

( नक्की वाचा : 'महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल' दोन्ही ठाकरेंच्या युतीवर उद्धव यांचं मोठं वक्तव्य )

राहुल गांधी यांनी या लेखात 2023 साली निवडणूक आयुक्तानं नियुक्त केलेल्या कायद्याद्वारे बदलांचा मुद्दा उपस्थित केला आहे. या कायद्याने निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीमधून भारताच्या सरन्यायाधीशांना वगळून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्र्याला स्थान दिले. यामुळे कार्यकारी मंडळाच्या बाजूने संतुलन निर्णायकपणे झुकल्याचा दावा त्यांनी केला

'निवड समितीत सरन्यायाधीशांच्या जागी मंत्रिमंडळातील मंत्र्याला स्थान देण्याचा निर्णय 'स्मैल टेस्ट' (Smell Test) पास करत नाही. स्वतःला विचारा, महत्त्वाच्या संस्थेतून तटस्थ मध्यस्थाला दूर करण्यासाठी कोणी इतके प्रयत्न का करेल? प्रश्न विचारणे म्हणजे उत्तर जाणून घेणे,' असे गांधी यांनी लिहिले.

मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. 'राहुल गांधी यांनी बिहारमध्ये आपली हार मानली आहे. राहुल गांधी जमिनीवर उतरत नाही, वस्तुस्थीती समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत त्यांचा पक्ष निवडणूक जिंकू शकत नाही. राहुल गांधी नेहमी खोटे बोलून मतदारांचा अपमान केला त्याचा मी निषेध करतो 

Advertisement

राहुल गांधी काय बोलतात हे त्यांना स्वत:लाही माहिती नसतं, लोकांना पण कळतं नाही, स्वतःच्या मनाला समजावण्यासाठी राहुल गांधीना रोज खोटं बोलायची सवय लागली आहे,' असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.
 

Topics mentioned in this article