Thackeray vs Shinde : 'कम ऑन किल मी' ठाकरे आणि शिंदेंचा मेळाव्यात गाजला नानाचा डायलॉग, नेमकं काय घडलं?

Thackeray vs Shinde : उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला नाना पाटेकर यांच्या चित्रपटातील डायलॉग वापरत विरोधकांना आव्हान दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्याला उत्तर दिलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Thackeray vs Shinde :नाना पाटेकर यांचा एक डायलॉग दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषात वापरला.
मुंबई:

Thackeray vs Shinde : शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन कार्यक्रम गुुरुवारी (19 जून) पार पडला. या निमित्तानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही शिवसेनेच्या पक्षाचे स्वतंत्र मेळावे झाले. शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापनदिन षणमुखानंद हॉलमध्ये होणार आहे तर वरळीमध्ये शिंदे यांच्या शिवसेना मेळावा झाला. दोन्ही नेत्यांनी या भाषणात एकमेकांवर जोरदार हल्ला केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला नाना पाटेकर यांच्या चित्रपटातील डायलॉग वापरत विरोधकांना आव्हान दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्याला उत्तर दिलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले होते ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा ऐकवला. 1992 साली मुंबईत दंगल उसळली होती. त्यावेळी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी छातीचा कोट करत मुंबई वाचवली. त्यावेळी एक व्यक्ती बाळासाहेबांकडे आली आणि म्हणाली बाळासाहेब आता पुरे झाली. ती व्यक्ती आता हयात नाही.मी त्यांचे नाव सांगणार नाही. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्या प्रहार सिनेमातील एक डायलॉग ऐकवला होता.

उद्धव ठाकरेंनी तो डायलॉग ऐकवत विरोधकांना आव्हान दिलं. ते म्हणाले, 'नाना पाटेकर त्या चित्रपटामध्ये गुंडासमोर उभा राहून म्हणतात 'कम ऑन किल मी'. त्याप्रमाणे मी देखील गद्दारांसमोर उभा राहतो आणि म्हणतो 'कम ऑन किल मी'. असेल हिंमत तर या अंगावर. पण अंगावर येणार असाल तर रुग्णवाहिका घेऊन या. कारण येताना सरळ याल आणि जाताना आडवं होऊन जाल.' 

( नक्की वाचा : Eknath Shinde : राक्षसाचा जीव पोपटात, तसा यांचा जीव BMC.... एकनाथ शिंदेंनी फुंकलं निवडणुकांचं रणशिंग )
 

शिंदेंनी दिलं उत्तर

उद्धव ठाकरेंच्या भाषणनंतर एकनाथ शिंदे यांचे भाषण झाले. त्यांनी यावेळी ठाकरे यांच्या या वक्तव्याला उत्तर दिले. ते म्हणाले,  'कम ऑन किल मी' असं उद्धव ठाकरे म्हणाले. अरे मेलेल्यांना कोण मारणार? महाराष्ट्राच्या जनतेने यांचा मुडदा आधीच पाडला आहे. पण नुसताच शोर करून मनगटात जोर येत नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडग्याला वाघ होता येत नाही. नुसता तोंडाच्या वाफा सोडून उपयोग नाही, मनगटात दम असावा लागतो.  तुम्ही आमच्या नादाला लागू नका . तुम्हाला तीन वर्षांपूर्वी दाखवलंय. 

Advertisement

(नक्की वाचा : Exclusive : वर्धापनदिनीच वाढलं ठाकरेंचं टेन्शन! खासदार आमच्या संपर्कात, लवकरच... केंद्रीय मंत्र्यांचा दावा )
 

मुंबईचा लढा चॅम्पियन काही लोकांनी चालवलाय यांना आता मुंबईचा लढा आठवला का? मुंबईत सत्तेत असताना तिजोरी फोडा, आणि सत्तेत नसताना मुंबईचा लढा. लोकांशी लढण्यासाठी घराबाहेर पडलं पाहिजे घरात बसून लढता येत नाही. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि कुणाचा बाप जरी आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकणार नाही.'

Topics mentioned in this article