जाहिरात

Gokul Milk : नाविद मुश्रीफ कसे बनले गोकुळचे अध्यक्ष? वाचा Inside Story

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचे नेते नाविद मुश्रीफ यांची निवड झाली. विशेष म्हणजे दोन दिवसात असं काय घडलं ज्यामुळ अध्यक्ष पदाच नावच बदलल असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित होतोय. 

Gokul Milk : नाविद मुश्रीफ कसे बनले गोकुळचे अध्यक्ष? वाचा Inside Story
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी 

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचे नेते नाविद मुश्रीफ यांची निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर अचानक ट्वीस्ट निर्माण झाला. खरंतर या नावामुळे गोकुळच्या नव्या राजकारणाची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसात असं काय घडलं ज्यामुळ अध्यक्ष पदाच नावच बदलल असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित होतोय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ हे नवे अध्यक्ष बनले आहेत. मुश्रीफाकडे आता जिल्ह्याच्या सहकारी संस्थांची चावी आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण कुठंच चर्चेत नसलेल नाव अचानक समोर कसं आलं याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक घडामोडी याला कारणीभूत असल्याच दिसून येतं. या घडामोडीमध्ये महायुतीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मोठी भूमिका बजावली आहे.  . अनेकवेळा माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सावधपणे उत्तरे दिली. ज्यामुळ कुठंही त्यांच्या मुलाबाबत नाव समोर आलेलं नव्हतं. शशिकांत पाटील, बाबासाहेब चौगुले, अमर पाटील, करण सिंह गायकवाड, अजित नरके हे सर्वजण यासाठी इच्छुक होते. पण थेट अध्यक्ष निवडीच्या दिवशीच नाविद मुश्रीफ हे नाव जाहीर झालं. 

( नक्की वाचा : मुंबई- नाशिक महामार्गाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री गंभीर, कंत्राटदारांना दिला इशारा )
 

 राजकीय वळण

गोकुळ अध्यक्ष पदावर असलेले माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे राजीनामा देणार नसल्याच्या चर्चा सुरु झालेल्या. या चर्चा सुरु होण्यापाठीमागे एकमेव कारण होतं ते म्हणजे त्यांच्या पदाची मुदत. 25 मे रोजी त्यांची मुदत संपली. मात्र मुदत संपली असली तरी ते नव्या अध्यक्ष निवडीपर्यंत पदावर होते. जर त्यांनी राजीनामा दिला नसता तर मात्र मोठी घडामोड पाहायला मिळाली असती. डोंगळे यांची मुदत संपण्याच्या पंधरा दिवस आधीच राजीनाम्याबाबत चर्चा सुरु झाली. ही चर्चा सुरु होण्यापाठीमागे कारण होतं ते खासदार धनंजय महाडिक यांनी विनय कोरे यांची घेतलेली भेट. या भेटीनंतरच गोकुळ मध्ये काहीतरी होणार अशा चर्चा सुरु झाल्या. 

अध्यक्ष महायुतीचाच असणार

दरम्यानच्या काळात अरुण डोंगळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली. ही भेट गोकुळ साठीच होती अशा चर्चा रंगल्या. काही तज्ज्ञच्या मते हे खरं देखील होतं. शिंदे यांच्या भेटीनंतर काही दिवसांनी त्यांनी राजीनामा दिला. पण यापूर्वी त्यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं ते म्हणजे गोकुळला राज्यातल्या सत्तेच्या विरोधात जाता येणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे गोकुळमध्ये महायुतीचाच उमेदवार असणार अशी दाट शक्यता निर्माण झाली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महादेवराव महाडिक यांची भेट

डोंगळेच्या राजीनाम्यापूर्वी संचालकांची एक बैठक पार पडली. या बैठकीत 19 संचालकांनी सत्ताधारी गटाला पाठिंबा दर्शवलेला. या बैठकीनंतर खरा ट्वीस्ट निर्माण झाला तो म्हणजे अध्यक्ष पदाच्या नावाचा. गोकुळमध्ये ज्यांनी यापूर्वी सत्ता गाजवलेली ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. गोकुळच्या राजकारणातील मुख्य नेत्याचीच भेट घेतल्यामुळे याला वेगळं स्वरूप आलं. या बैठकीत गोकुळच्या राजकारणाविषयी चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली गेली. याच भेटीनंतर ट्वीस्ट तयार झाल्याची शक्यता आहे. 

महायुतीचाच अध्यक्ष करा, वरिष्ठ पातळीवरून सूचना

महायुतीचाच उमेदवार हा गोकुळचा अध्यक्ष व्हावा अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून महायुतीच्या नेत्यांना मिळाल्या.  या सुचनेनंतर मुश्रीफानी जिल्हा बँकेत आमदार सतेज पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह इतर सर्व महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत यापूर्वी ज्यांचं नाव चर्चेत होतं ते शशिकांत पाटील चुयेकर यांचं नाव मागे पडलं. बंद पाकिटात नाव महायुतीच्या नेत्याच नाव देण्याचं ठरलं. त्यामुळे एका रात्रीत घडामोडीना वेग आला. 

 इतर तालुक्यानाही अध्यक्ष पद देण्यासाठी निर्णय

अध्यक्ष पदासाठी नाविद मुश्रीफ यांचं नाव जाहीर झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी यामागे नेमकं काय कारण आहे हे सांगितलं. पूर्वी गोकुळ दूध संघ एकाच व्यक्तीच्या भोवती होता. आता मात्र ही स्थिती नाही. पाच लाख लोकांच्या भोवती ही सत्ता आहे. करवीर, राधानगरी तालुक्याला यापूर्वी अध्यक्ष पद मिळालं असल्याने आता हे अध्यक्ष पद इतर तालुक्याना मिळावा अशी इच्छा आहे. त्यामुळेच कागल तालुक्याकडे देण्याचा विचार केला गेला असल्याच सांगितलं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. 

या सगळ्या घडामोडीमध्ये एक गोष्ट महत्वाची. ती म्हणजे राजकीय व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या मुश्रीफ यांच्या राजकीय खेळीची. आमदार सतेज पाटील यांच्याशी असलेली घट्ट मैत्री आणि राज्यातल्या सत्तेतले नेते. त्यामुळेच कोल्हापुरात वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी सहकारी संस्था ताब्यात ठेवण्यासाठी केलेल्या जोडण्या. या सगळ्या गोष्टी नाविद मुश्रीफ यांना अध्यक्ष बनण्यात सोईस्कर ठरल्या आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com