Uddhav - Raj : उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार? नगरसेवकांच्या बैठकीतून मोठे अपडेट

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा सध्या राज्याच्या राजकारणातील मोठा प्रश्न आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मातोश्रीवर झालेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या आघाडीबाबत चर्चा केली.
मुंबई:

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा सध्या राज्याच्या राजकारणातील मोठा प्रश्न आहे.  विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे एकत्रिकरण दोन्ही पक्षांसाठी हे महत्त्वाचं मानलं जात आहे. नुकत्याच मातोश्रीवर झालेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या आघाडीबाबत चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना मनसेसोबत युती करायची का, असं विचारलं. नगरसेवकांनी या युतीचा त्यांनाच फायदा होईल, असं मत व्यक्त केलं. मुंबईत या आघाडीसाठी अनुकूल वातावरण असल्याचंही माजी नगरसेवकांनी मान्य केलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, टबई महानगरपालिकेसाठी मी तुम्हाला विश्वासात घेईन आणि कोणत्या पक्षासोबत आघाडी करायची, हे ठरवेन. तुम्ही आमच्यासोबत आहात, तुम्ही निष्ठावान आहात आणि येत्या काळात अनेक बैठका होणार आहेत. माजी नगरसेवकांनी शिवसेना भवनात येऊन सामान्य लोकांच्या समस्या सोडवाव्यात.' यावेळी उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना शिवसेना भवनात निवडणूक कार्यालय उघडण्याचे आदेश दिले.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक जुना फोटो चर्चेचा विषय बनला आहे, ज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसत आहेत. हा फोटो शिवसेना (यूबीटी) च्या 'सामना' मुखपत्राच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे यांनी नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) युतीबद्दल सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यामुळे हा फोटो प्रसिद्ध होण्याला वेगळं महत्त्व आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : BMC Election : राष्ट्रवादी आणि शिवसेनेत टाळीची चर्चा, पण काँग्रेसचं काय चाललंय? वाचा Inside Report )
 

ठाकरे बंधू एकत्र येतील पण...

बीएमसी निवडणुकीसाठी कदाचित ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, पण निवडणुकीनंतर ते एकत्र राहतील की नाही, हा मोठा प्रश्न आहे, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. 
दोन्ही पक्षांची हिंदुत्व आणि मराठी माणूस याबद्दलची विचारधारा जवळपास सारखीच आहे.  पण त्यांच्या एकत्र येण्यासाठी अनेक अटी आहेत. उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीची साथ सोडावी लागेल आणि राज ठाकरे यांना महायुतीबद्दलचा त्यांचा ओढा कमी करावा लागेल.

Advertisement

आता ठाकरं बंधू हे अडथळे कसे पार करतात यावर त्यांच्या संभाव्य युतीचं भवितव्य अवलंबून आहे. 
 

Topics mentioned in this article