
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. त्यांनी टीका करताना थेट संजय राऊत यांचा बापच काढला आहे. राऊत यांनी 50 कोटी रुपये माझ्या बँक खात्यावर आले असा आरोप केला आहे. माझ्या खात्यावर जर पैसे आले असतील तर ते पैसे राजाराम राऊत यांच्या नावावर ठेवावेत. अशा शब्दात राऊत यांच्यावर खरमरीत टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. तसेच भास्कर जाधव नाराज असल्याचाही दावा पाटील यांनी यावेळी केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे लागले होते. पक्ष आपण हायजॅक करू. पण शिंदे यांनी त्यांचे ऐकले नाही. त्यानंतर संजय राऊत उद्धव ठाकरेंना वेगळ्या मार्गाने घेऊन गेले. म्हणूनच आज लोक नाराज होत आहेत. भास्कर जाधव यांच्यासारखे लोकही ठाकरे गटात नाराज आहेत,असा दावा यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला.
संजय राऊत यांच्याकडे फक्त भोंगा वाजवण्याचेच व्हिजन आहे. पक्षवाढ करणे, विकासाचे व्हिजन त्यांच्याकडे नाही. त्यामुळे राऊत यांना कधी खडी, कधी रस्ता खाल्ला म्हणून बडबड करावी लागते. अशा शब्दात राऊत यांनी समृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ वरून केलेल्या टीकेला मंत्री पाटील यांना उत्तर दिले. विधिमंडळातील चांदीच्या ताटात झालेल्या जेवणावळी वरून कुठल्या दुकानातून चांदी घेतली, यांची आपल्याला माहिती नाही असेही पाटील यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world