
विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील आमदारांच्या मतांच्या आधारे हे सर्व आमदार निवडले जातील. विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहाता भाजपाचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एक आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा एक आमदार निवडून येऊ शकतो. याच पक्षाच्या जागा सध्या रिक्त झाल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानन परिषदेच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची यादी भाजपानं दिल्लीला पाठवली आहे. यामध्ये दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. माधव भंडारी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी दीर्घकाळ पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम केले आहे. ते अनेक वर्षांपासून विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी इच्छूक होते. पण, त्यांना आजवर नेहमीच आमदारकीनं हुलकावणी दिली आहे. आता यंदा त्यांच्या नावाचा पक्षानं समावेश केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
का होत आहे निवडणूक?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.
या जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यासाठी 57 मतांचा कोटा लागेल सध्या परिस्थितीत विरोधी काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार यांचा गट यांच्या तिघांची एकत्रित बेरीज केली तरीही 57 मत होत नसल्याने त्यांचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा : Maharashtra Budget 2025 : कसा आहे राज्याचा अर्थसंकल्प? 5 मुद्यातून समजून घ्या संपूर्ण बजेट! )
राष्ट्रवादीकडून कुणाची चर्चा?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. या जागेसाठी संग्राम कोते पाटील, झिशान सिद्दीकी आणि आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world