एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. चाळीस पेक्षा जास्त आमदार हे उद्धव ठाकरेंना सोडून गेले. आमदार गेले तसा पक्ष ही उद्धव ठाकरे यांच्या हातून गेला. मात्र त्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सतत टीकेचे बाण सोडले जात आहेत. त्याला शिंदे गटाकडून तेवढ्याच ताकदीने उत्तर ही दिले जात आहे. आता चाळीस आमदार सोडून का गेले असा प्रश्न शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवाय यातून त्यांनी ठाकरे गटाला डीवचण्याचा प्रयत्न ही केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
म्हशीचा की रेड्याचा बळी दिला, हे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले हे पाहिलं असतं तर पक्ष टिकला असता असं वक्तव्य संजय शिरसाठ यांनी केलं आहे. आम्ही म्हशीचा बळी दिला का रेड्याच्या बळी दिला हे पाहण्यापेक्षा,पक्षातले आमदार कसे गेले हे पाहिलं असतं, तर पक्ष टिकला असता,अश्या शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
तसेच कामाख्या देवीला गेलो,हा आमचा पिक्चर सर्व जगाने पाहिला आहे. त्या ठिकाणी म्हशीचा का रेड्याचा बळी दिला,हे पाहायला संजय राऊत कुठून आले होते, हे आम्हाला माहीत नाही. पण ते मूर्खासारखे बडबडतात. आणि पश्चाताप करण्यापेक्षा टीका करण्यामध्ये ते धन्यता मानतात. त्यामुळे आज देखील उबाठा मधून आउटगोइंग सुरूच आहे. त्यांनी बडबड तशीच ठेवावी, असा टोला देखील मंत्री संजय शिरसाठानी लगावला आहे. ते सांगलीच्या मिरज मध्ये बोलत होते.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर संजय राऊत हे सातत्याने शिंदे गटावर टीका करत आले आहेत. पण त्यांना ही तशाच पद्धतीचे उत्तर मिळालं आहे. आता शिवसेनेची दोन शकलं झाली आहे. त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आहेत. अशा वेळी दोन्ही शिवसेना एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.