Shahaji Bapu Patil: शहाजी बापूंना झाली त्यांच्याच डायलॉगची आठवण, म्हणाले तो आज ही...

सिद्धाराम म्हेत्रे हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढावतील असं म्हणतांना त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

जाहिरात
Read Time: 3 mins
सोलापूर:

शहाजी बापू पाटील म्हणले की आठवते काय झाडी, काय डोंगर हा त्यांचा डायलॉग. त्यावेळी हा डायलॉगनं महाराष्ट्रा अगदी धुमाकूळ घातला होता. पण विधानसभा निवडणूकीत शहाजी बापूंचा पराभव झाला. ते माजी आमदार झाले. त्यानंतर त्यांचा डायलॉगही काहीसा मागे पडला. पण त्यात त्यांना आता पुन्हा प्राण भरले आहेत. निमित्त होते काँग्रेस नेते सिद्धराम म्हेत्रे यांच्या पक्ष प्रवेशाचे. त्यांनी यावेळी बोलताना, मी गुवाहटी वरून आलो तेंव्हा त्या झाडी-डोंगराने नुसता राडा घातला होता. अडीच वर्ष झाले पण माझा डायलॉग काय शिळा झाला नाही. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, समदं काय ओक्के आणि शिंदे साहेबांची शिवसेना डबल ओक्के " असं म्हणताच एकच टाळ्या आणि शिट्ट्यांनी सभा दणाणून गेली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुढे ते म्हणाले आम्ही गुवाहटीला गेलो होतो. त्यानंतर पहिला ठोका येणार गद्दार, दुसरा किती खाल्ले आणि तिसरा येणार बेईमान अवलाद. महाविकास आघाडीत शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार संपवण्याचा घाट घातला जात होता. म्हणून आम्ही गुवाहटीला गेलो. एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री पुन्हा कधी होणार नाही, असं आता सर्वच जण बोलत आहेत असं ही ते म्हणाले. गौतम बुध्दा सारखी करुणा असणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे आहे. इरशाळवाडी दुर्घटने वेळी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे स्वतः डोंगरावर चढून गेली. स्वतः चा जीव धोक्यात घातला. पेहलगाममध्ये गोळीबार झाला तेव्हा कुठलाही मुख्यमंत्री तिथं धावून गेला नाही. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडकलेल्या मराठी माणसांना विमानात करून महाराष्ट्रात आणलं. असं यावेळी बापूंनी सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Shocking news: DJ च्या आवाजाने मुलीला आला हार्ट अटॅक, ती तडफत राहिली, रुग्णालय पाहात राहिलं, शेवटी...

सिद्धाराम म्हेत्रे हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढावतील असं म्हणतांना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसची अवस्था ही आषाढी वारीच्या पालखीतील घोड्यासारखी झाली आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा नेता दिसून येत नाही.पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पतंगराव कदम हे सर्व जण आपण काँग्रेस सोडल्यावर रागावले होते असं ते यावेळी म्हणाले. मात्र मी त्यावेळेस शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय योग्य ठरला. मी युवक काँग्रेसच्या व्यासपीठावर युवा असताना सांगितलं होतं, तरुण, तरुणी, शेतकरी, मजुरांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, नाही तर एक दिवस विधानमंडळावर भगवा फडकेल. आपण जे बोललो ते खरं ठरलं असं ही ते सांगायला विसरले नाहीत.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Kalyan News: परदेशात जाण्याआधीच विमान जमिनीवर उतरले, कोट्यावधींचा गंडा घालत शेकडो तरुणांना फसवले

मी आणि म्हेत्रे साहेब घरात पडून राहिलो. मात्र  शरद पवार यांनी सुप्रियाताई ना पुढं आणलं. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणितीताईंना पुढं आणलं. पुढे जावून त्या  मुंबईतून दिल्लीत कधी गेल्या कळलं नाही. मात्र आम्ही तिथेच राहिलो. मुंबईमध्ये 10 हजार मतदान माळी समाजाचे नसेल, मात्र छगन भुजबळ हे शिवसेनेकडून मुंबईचे महापौर झाले. शिवसेनेने कधी जातं बघितली नाही. असं ते यावेळी आवर्जून म्हणाले. लाडक्या बहीणींना 1500 रुपये देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेनी घेतला. ही योजना कधीच बंद होणार नाही. जो ही योजना बंद करेल त्याची खुर्ची जाईल अशी सोय शिंदेंनी करून ठेवली आहे असं ही ते यावेळी म्हणाले. 

Advertisement