Devendra Fadnavis:'आपण हिंदू आहोत, एक है तो सेफ है' ब्राम्हण समाजाबाबतही फडणवीसांचे मोठे विधान

यावेळी चित्तपावन ब्राह्मण संघाचे त्यांनी अभिनंदन केले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

आपण सगळे हिंदू आहोत, एक है तो सेफ है, आपण सगळे सनातन धर्मीय आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. धर्म आणि मानके एक आहे. जात पंथ वेगळे असले तरी आपण एक आहोत. सनातन विचार पुढील पिढी पर्यंत घेऊन जायचा आहे. असं ही फडणवीस यावेळी म्हणाले. शिवाय ब्राम्हण हे संख्येने जरी कमी असले तरी ते दुधात साखरेचं काम करत असतात असं वक्तव्य ही यावेळी फडणवीसांनी केलं. नाशिक इथं परशुराम भवनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इतिहासत कोणतेही असे क्षेत्र नाही ज्यामध्ये चित्तपावन समाजाची लोकं दिसत नाहीत. मग  स्वातंत्र्य चळवळ असो की कला क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात या समाजाचं मोठं योगदान राहीलं आहे. साहित्य क्षेत्रातही कोणती ही 10 नावं काढली तर त्यात 3-4 नावं चित्तपावन समाजाची मिळतीलच असं ही यावेळी फडणवीस म्हणाले. राजकीय क्षेत्रात संख्या महत्त्वाची असते. ब्रह्मण बोटावर मोजण्या इतके आहेत. पण ब्राह्मण समाजाचं काम दुधात साखरेसारखं असतं असं ही ते यावेळी म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Political News: सुप्रिम कोर्टाचा दणका! 'ते' दोन टेंडर झाले रद्द, शिंदेंचे टेन्शन वाढणार?

यावेळी चित्तपावन ब्राह्मण संघाचे त्यांनी अभिनंदन केले. नाशिकमध्ये अतिशय सुंदर भवन उभारलं आहे. त्याच्या उद्घाटनाची संधी दिल्या बद्दल आपण सर्वांचे आभारी आहोत असं ही फडणवीस यावेळी म्हणाले. हॉस्टेलसुद्धा उभारले आहे. अमृत स्नानाच्या तारखांची आज घोषणा करायची होती. त्यासाठी आलो होतो असं ते म्हणाले. 93 वर्षे सातत्यानं ही संघटना काम करत आहे. 1933 ला जी सभा झाली होती, त्याचे सुद्धा इतिवृत्त इथं वाचायला मिळालं. गरजू लोकांना मदत करता आली पाहिजे असं फडणवीस यावेळी म्हणाले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Beed News : परळी वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात मटण, ऑम्लेट शिजवल्याचा प्रकार; भाविकांचा संताप

जातीय व्यवस्था असू नये असे वाटते, पण जात कधीच जात नाही हे ही फडणवीसांनी मान्य केलं. जातीय विषमता नसावी असे वाटते. राजकीय क्षेत्रात संख्या महत्त्वाची असते. ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. असं असलं तरी  ब्राह्मण समाजाचं काम दुधात साखरेचं आहे. चिमूटभर साखर टाकली तरी गोडवा तयार करण्याचं काम, हा समाज करतो हे कधी ही विसरता कामा नये असं ही ते यावेळी म्हणाले. 

Advertisement

Topics mentioned in this article