
Chinnaswamy Stadium stampede : बंगळुरूमध्ये आयपीएल चॅम्पियन बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स (RCB) च्या विजय मिरवणुकीदरम्यान बुधवारी संध्याकाळी जे घडले, ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. क्रिकेट फॅन्स त्यांच्या लाडक्या खेळासाठी काहीही करायला तयार असतात. पण, बुधवारी संध्याकाळी जे घडलं ते सर्वांनाच अस्वस्थ करणारे आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विराट कोहली आणि आरसीबीचे लाखो फॅन्स चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. फक्त एक झलक पाहण्यासाठी सर्वजण आतुर होते, पण त्याचवेळी गडबड झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये बंगळुरुच्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या देवीचाही समावेश आहे. देवी ही विराट कोहलीची जबरदस्त फॅन होती. शहरातील कोणतीही मॅच ती सोडत नसे. आरसीबीच्या विजयी मिरवणुकीच्या दिवशी तिला तिकीट मिळाले नव्हते.
दैवाचा हा इशारा देवीला समजलाच नाही आणि ऑफिसचे काम सोडून ती स्टेडियमकडे धावली, पण परत आलीच नाही. स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत देवीचा मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Bengaluru Stampede : कुणी दबलं, कुणी चिरडलं... RCB विजेतेपदाच्या जल्लोषातील चेंगराचेंगरीचे 5 भयानक Video )
ऑफिसमध्ये सुट्टी घेऊन गेली आणि...
आरसीबीच्या विजय मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी देवीने आपल्या बॉसकडे सुट्टीसाठी विनंती केली. दुपारी 2.30 च्या सुमारास ऑफिसमधून तिला काही तासांची सुट्टी मंजूर झाली. त्यानंतर देवीच्या आनंदाला पारावार उरला नाही. लॅपटॉप टेबलावरच सोडून ती स्टेडियमकडे धावली. पण, मृत्यू तिची वाट पाहतोय, हे तिला माहिती नव्हतं.
देवीचा लॅपटॉप अजूनही टेबलावरच
तिच्या मैत्रिणीने डोळ्यात पाणी आणून सांगितले की, देवीचा लॅपटॉप अजूनही टेबलावरच आहे. तिने सांगितले की, बेंगळुरूला आल्यापासून तिने इथला एकही सामना चुकवला नव्हता. जेव्हा तिला समजले की स्टेडियममध्ये जाण्यासाठी कदाचित तिकीट मिळेल, तेव्हा ती तिथे जाण्यासाठी खूप आतुर झाली. ही संधी तिला सोडायची नव्हती.

Photo Credit: PTI
वेडेपणा मृत्यूचे कारण बनला
देवी ऑफिसमधून काही तासांची सुट्टी घेऊन चिन्नास्वामी स्टेडियमकडे धावली. तिला वाटले होते की कदाचित तिथे काहीतरी तिकीटाची व्यवस्था होईल. देवीने ऑफिसमधून निघतानाच आपल्या मैत्रिणीला मेसेज केला की ती स्टेडियमला जाण्यासाठी मेट्रो घेत आहे. हा देवीचा शेवटचा आवाज होता, जो तिच्या मैत्रिणीने ऐकला होता. त्यानंतर देवी परतलीच नाही.
चेंगराचेंगरीत देवीचा मृत्यू, ऑफिसमध्ये शांतता
चिन्नास्वामी स्टेडियच्या गेट नंबर 7 च्या बाहेर मोफत तिकीट मिळेल या अफवेमुळे चेंगराचेंगरी झाली. लोकं एकमेकांवर पडत होते. लाखो लोकांच्या गर्दीत दबलेले लोक एकमेकांवर असे पडले की उठूच शकले नाहीत. कुणाचा श्वास गुदमरला तर कुणी गर्दीखाली दबले. देवीही या दुर्घटनेची शिकार झाली. आता ती कधीच परत येणार नाही. चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता 40 हजार लोकांची आहे, पण तिथे 2-3 लाख जण पोहोचले आणि मोठा अपघात घडला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world