जाहिरात

जगातील एकमेव क्रिकेटपटू जे भारताकडून पदार्पण करण्यापूर्वी इंग्लंडकडून खेळले, पदार्पणातच झळकावली सेंच्युरी

Iftikhar Ali Khan Pataudi: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिज यापूर्वी पतौडी ट्रॉफी म्हणून ओळखली जात होती.

जगातील एकमेव क्रिकेटपटू जे भारताकडून पदार्पण करण्यापूर्वी इंग्लंडकडून खेळले, पदार्पणातच झळकावली सेंच्युरी
Iftikhar Ali Khan Pataudi: ते टीम इंडियाचे तिसरे टेस्ट कॅप्टन होते. त्यांनी 36 व्या वर्षी भारताकडून पदार्पण केलं.
मुंबई:

Iftikhar Ali Khan Pataudi: भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी पाच टेस्टची सीरिज आता महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन (Tendulkar Anderson Trophy  यांच्या नावावर खेळवली जाईल. याआधी ही कसोटी मालिका पतौडी ट्रॉफी म्हणून ओळखली जात होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पतौडी ट्रॉफीची सुरुवात 2007 मध्ये झाली होती. 2007 मध्ये इंग्लंडमध्ये भारताच्या पहिल्या कसोटी मालिकेची 75 वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्तानं ती सुरू करण्यात आली होती. या ट्रॉफीला पतौडी कुटुंबाचे नाव देण्यात आले होते. विशेषतः इफ्तिखार अली खान पतौडी (इंग्लंड आणि भारत या दोन्ही देशांकडून कसोटी खेळणारे एकमेव भारतीय क्रिकेटपटू) आणि त्यांचे पुत्र मन्सूर अली खान पतौडी यांच्या सन्मानार्थ हे नाव दिले होते. मन्सूर अली खान पतौडी हे भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन होते. त्यांना 'टायगर' पतौडी म्हणून ओळखले जात होते.

 इंग्लंड आणि भारतासाठी खेळणारे एकमेव क्रिकेटपटू

इफ्तिखार अली खान पतौडी हे एकमेव असे क्रिकेटपटू आहेत ज्यांनी इंग्लंड आणि भारत या दोन्ही देशांसाठी टेस्ट क्रिकेट खेळले आहेत. पंजाबच्या शाही पतौडी घराण्यात 16 मार्च 1910 रोजी जन्मलेल्या इफ्तिखार अली खान पतौडी यांनी 1932 मध्ये इंग्लंडसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये इफ्तिखार अली खान पतौडी इंग्लंडकडून खेळले होते.

( नक्की वाचा : Mumbai Indians : मुंबई इंडियन्स 'इन अ‍ॅक्शन' पुढील सिझनपूर्वी रोहित शर्मासह 5 जणांची होणार हकालपट्टी? )
 

आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये इफ्तिखार अली खान पतौडी यांनी 102 रन्सची खेळी केली होती. त्यांनी 380 बॉलमध्ये 102 रन केले होते. त्यांच्या खेळीत 4 फोरचा समावेश होता. इफ्तिखार अली खान इंग्लंडकडून एकूण तीन टेस्ट खेळले. त्यामध्ये त्यांनी एका सेंच्युरीसह 144 रन्स काढले. 

इफ्तिखार अली खान त्यानंतर भारतात परतले आणि त्यांनी भारतीय टीमकडू पदार्पण केले. 1946 मध्ये इफ्तिखार अली खान पतौडी यांनी भारतासाठी पहिली टेस्ट मॅच खेळली.1946 च्या इंग्लंड दौऱ्यावर त्यांनी भारतासाठी लॉर्ड्स टेस्टमध्ये पदार्पण केले. भारतासाठी इफ्तिखार अली खान पतौडी यांनी देखील टेस्ट मॅच खेळल्या. त्यांनी 5 इनिंगमध्ये 55 रन्स केले. भारतासाठी त्यांच्या नावावर एकही सेंच्युरी किंवा हाफ सेंच्युरीची नोंद नाही. 

( नक्की वाचा : Shreyas Iyer : 'श्रेयसनं गुन्हेगारी कृत्य केलं, कोणतीही माफी नाही' माजी क्रिकेटपटू संतापले )
 

ते भारतीय टीमचे टेस्ट क्रिकेटमध्ये  नेतृत्व करणारे तिसरे कॅप्टन होते.  त्यांच्या आधी सी.के. नायडू आणि महाराज ऑफ विजयनगरम यांनी भारताचे नेतृत्त्व केले होते. इफ्तिखार अली खान पतौडी यांनी भारतासाठी पहिली टेस्ट मॅच खेळली तेव्हा त्यांचे वय 36 वर्षे होते.

मुलानं जपला वारसा

नवाब पतौडी सीनियर यांच्या मुलाने त्यांचा वारसा पुढे नेला. भारतीय क्रिकेट टीमच्या सर्वोत्तम कॅप्टनमध्ये त्यांचा समावेश आहे.  त्यांना ‘टायगर पतौडी' असे नाव देण्यात आले. मन्सूर अली खान पतौडी यांनी भारतासाठी 46 टेस्ट मॅच खेळल्या. त्यामध्ये 6 सेंच्युरी आणि 16 हाफ सेंच्युरीच्या मदतीने 2793 रन्स केले. इफ्तिखारचे नातू, सैफ अली खान आणि सोहा अली खान, हे बॉलिवूड स्टार आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com