जाहिरात

Shreyas Iyer : 'श्रेयसनं गुन्हेगारी कृत्य केलं, कोणतीही माफी नाही' माजी क्रिकेटपटू संतापले

IPL 2025 Final : पंजाब किंग्जचं (Punjab Kings) आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न यंदाही अपुरं राहिलं. पंजाबच्या या पराभवानंतर त्यांच्या फॅन्समध्ये निराशेचं वातावरण आहे.

Shreyas Iyer : 'श्रेयसनं गुन्हेगारी कृत्य केलं, कोणतीही माफी नाही' माजी क्रिकेटपटू संतापले
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरची विकेट आयपीएल फायनलमधील टर्निंग पॉईंट ठरला. (फोटो - BCCI)
मुंबई:

IPL 2025 Final : पंजाब किंग्जचं (Punjab Kings) आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न यंदाही अपुरं राहिलं. लीग मॅचेसमध्ये पहिल्या क्रमांकासह 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केलेल्या पंजाब किंग्जचा फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं ( Royal Challengers Bengaluru ) 6 रन्सनं पराभव केला. 2014 नंतर पंजाबची टीम पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली होती. पण, त्यांना अखेर निराशा सहन करावी लागली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पंजाबच्या या पराभवानंतर त्यांच्या फॅन्समध्ये निराशेचं वातावरण आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू योगराज सिंह (Yograj Singh) देखील नाराज आहेत. नेहमी वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या योगराज यांनी पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) बाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

योगराज यांनी आयपीएल फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या आऊट होण्यावर जोरदार टीका केली आहे. श्रेयस आऊट होण्याची पद्धत ही 'गुन्हेगारी कृत्य'  (criminal offence) असल्याचं त्यांनी सांगितलं. आयपीएल फायनलमध्ये श्रेयसची विकेट ही टर्निंग पॉईंट ठरली. तो रोमारियो शेफर्डच्या बॉलिंगवर फक्त 2 बॉलमध्ये 1 रन काढून विकेट किपर जितेश शर्माकडं कॅच देऊन आऊट झाला.  

IPL 2025 Final : साई सुदर्शन नाही तर सूर्यकुमारला मिळाला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कार, काय आहे कारण?

( नक्की वाचा :  IPL 2025 Final : साई सुदर्शन नाही तर सूर्यकुमारला मिळाला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कार, काय आहे कारण? )

श्रेयस अय्यरच्या आऊट होण्याच्या पद्धतीबद्दल बोलताना योगराज म्हणाले, 'फायनलमध्ये श्रेयस अय्यरने जो शॉट खेळला, तो माझ्या मते एक गुन्हेगारी कृत्य होते. अशोक मांकड यांनी मला या गुन्हेगारी कृत्याबद्दल सांगितले, जे कलम 302 (Section 302) अंतर्गत येते. त्यांनी मला असेही सांगितले की याचे परिणाम म्हणून तुम्हाला दोन मॅचसाठी बंदी घालण्यात येईल. श्रेयसने काल जे केले ते स्वीकारार्ह नाही. त्यासाठी कोणतीही माफी नाही.'

आयपीएल फायनलमध्ये आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना पंजाब किंग्जसमोर विजयासाठी 191 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. त्याला उत्तर देताना पंजाबनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 184 रन्स केले. पंजाबकडून शशांक सिंहनं सर्वात जास्त नाबाद 61 रन्सची खेळी केली. त्यानं फक्त 30 बॉलमध्ये 61 रन काढले. पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 29 रन्सची गरज होती. त्यावेळी शशांकनं शर्थीनं प्रयत्न करत 22 रन्स काढले. पण, त्याचे हे प्रयत्न अखेर अपुरेच ठरले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com