Virat Kohli Records: किंग कोहलीच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद; शिखर धवनसोबत केली बरोबरी

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने आता शिखर धवनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

IPL 2025 : आयपीएल 2025 ची फायनल गाठणारा रॉयल चॅलेन्जर्स बँगलोर पहिला संघ ठरला आहे. क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जला धूळ चारत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने चौथ्यांदा आयपीएलची फायनल गाठली आहे. कालच्या सामनच्या बँगलोरने पंजाबला 101 धावांत गुंडाळले. 102 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बंगलोरने पंजाबचा आठ विकेट्सने पराभव केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोहलीने विराटचा विक्रम

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने आता शिखर धवनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी, सर्वाधिक चौकारांच्या बाबतीत विराट दुसऱ्या स्थानावर होता. या यादीत अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी विराटला तीन चौकारांची आवश्यकता होती. परंतु किंग कोहली फक्त 12 धावा करू शकला. 

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2025: मुंबई इंडियन्स यंदा राहणार ट्रॉफीपासून दूर, 'हा' विचित्र योग आहे कारण! )

या दरम्यान विराटच्या बॅटमधून फक्त दोन चौकार आले. शिखर धवनने 222 सामन्यांपैकी 221 डावात 768 चौकार मारले आहेत. आता कोहलीनेही या विक्रमाची बरोबरी केली आहे आणि त्याने 266 सामन्यांच्या 258 डावात 768 चौकार मारले आहेत. या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 184 सामन्यांमध्ये 663 चौकार मारले आहेत.

Advertisement

(नक्की वाचा - MI vs GT : मुंबई इंडियन्सच्या दोन दिग्गज खेळाडूंनी बांधली गुडघ्याला पट्टी, हार्दिकची डोकेदुखी वाढली)

सामन्यात काय घडलं

सुयश शर्मा आणि जोश हेझलवूड यांच्या धारदार गोलंदाजी आणि त्यानंतर फिल साल्टच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने पंजाब किंग्जचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयासह, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याआधी रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबला 101 धावांवर रोखून कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. प्रत्युत्तरादाखल, सॉल्टच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने 10 षटकांत सामना जिंकला. साल्टने 27 चेंडूत 56 धावांची खेळी केली. 2009, 2011 आणि 2016 नंतर आरसीबी लीग फायनल खेळण्याची ही चौथी वेळ असेल .

Advertisement
Topics mentioned in this article