जाहिरात

Sarfaraz Khan: 'सरफराजबाबत काहीतरी चुकीचं घडलंय,' टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा धक्कादायक दावा

Sarfaraz Khan News : इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियात सरफराज खानचा समावेश करण्यात आलेला नाही. 27 वर्षांचा मुंबईकर हा  देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम बॅटर मानला जातो.

Sarfaraz Khan: 'सरफराजबाबत काहीतरी चुकीचं घडलंय,' टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा धक्कादायक दावा
Sarfaraz Khan : सरफराज खानला इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलिया सीरिजमध्येही संधी मिळाली नाही.
मुंबई:

Sarfaraz Khan News : इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियात सरफराज खानचा समावेश करण्यात आलेला नाही. 27 वर्षांचा मुंबईकर हा  देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम बॅटर मानला जातो. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध त्याने भारतासाठी 150 रन्सची दमदार खेळी केली होती. त्या सीरिजनंतर ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मुख्य टीममध्ये नसला तरी, सरफराज खानची इंडिया ए टीममध्ये निवड झाली होती. टीम इंडियाचा माजी खेळाडू आकाश चोप्रानं सरफराजबाबत मोठा दावा केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'सरफराज खानने आतापर्यंत काहीही चुकीचे केलेले नाही. उलट, त्याने आत्तापर्यंत काहीही चुकीचे केले नाहीये. तो जो एक सामना खेळला, त्यात त्याने 90 पेक्षा जास्त रन्स केले. त्याला सेंच्युरी करता आली नाही, पण त्याने रन केले. त्यानंतर, तुम्ही त्याला पुढील मॅचमध्ये खेळवले नाही आणि तो आता टेस्ट टीमचा भाग नाही," असे चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले.

त्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत अपयश पाहिले नाही, कारण त्याला संधीच मिळाली नाही. ही चांगली गोष्ट नाही.  तुम्हाला त्याच्या तंत्रावर किंवा खेळण्याच्या शैलीवर विश्वास नसेल की, तो तिथे रन करू शकणार नाही, तर तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. मग त्याला इंडिया ए सोबतही पाठवू नका, कारण तुमचे पूर्वग्रहदूषित मत असेल.

( नक्की वाचा : IND vs ENG : 10 किलो वजन कमी केलं पण तरीही सरफराजचं काय चुकलं? 3 कारणांमुळे झाली नाही निवड )
 

सरफराजला वाईट वाटणे स्वाभाविक आहे, असे चोप्राने म्हटले. "जर तुम्हाला वाटत असेल की तो धावा करू शकतो आणि म्हणूनच त्याची इंडिया ए संघात निवड झाली आहे, तर त्याला भारताच्या कसोटी संघातही खेळवा. त्याने काय चूक केली आहे? त्याने बंगळुरूमध्ये सेंच्युरी केली होती. 

त्यानंतर तो दोन मॅचमध्ये अपयशी ठरला, पण त्या मॅचमध्ये इतर कोणीही धावा केल्या नाहीत. ऑस्ट्रेलियात तो एकही मॅच खेळला नाही. तिथं त्याच्या नावावर चर्चाही झाली नाही. त्यामुळे, अशा परिस्थितीत, कुणालाही वाटू शकते की त्याच्यासोबत काहीतरी चुकीचे घडत आहे. त्याने काय चूक केली आहे? कदाचित, काहीच नाही. पण त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळत नाहीये. तो निवड समितीच्या योजनेतच नाही, ही थोडी दुःखद बाब आहे, असे आकाश चोप्रानं सांगितलं. 

यापूर्वी, देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर सात वर्षांनी टीममध्ये जागा मिळवलेल्या करुण नायरची निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरनं पाठराखण केली होती.  सरफराज खानऐवजी त्याला पसंती दिल्यावर आगरकर म्हणाला होता, तो इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करेल.

'कधीकधी तुम्हाला चांगले निर्णय घ्यावे लागतात. सरफराजने पहिल्या टेस्टमध्ये (न्यूझीलंडविरुद्ध) सेंच्युरी केली आणि त्यानंतर त्याला रन करता आल्या नाहीत, हे मला माहीत आहे. कधीकधी हे टीम मॅनेजमेंटचे निर्णय असतात. ते एखाद्यासाठी योग्य असोत किंवा अयोग्य, पण ते टीमच्या सर्वोत्तम हितासाठी घेतलेले निर्णय असतात," असं आगरकर म्हणाला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com