धाराशिवमध्ये वादळी वारा आणि गारपीटीसह पाऊस झालाय.परंडा तालुक्यातील शिरसावगावामध्ये 9 एकर पपईची बाग अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झालीय. तर अनेक ठिकाणी झाडांचं मोठं नुकसान झालंय.काढणीला आलेल्या पपईंचा शेतात खच पडलाय.दरम्यान शासनानं तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याची आहे.