धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या प्रकल्पाच्या कामाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे.सततच्या समस्यांमधून लोकांची सुटका होणार असल्याचा आनंद धारावीकरांना होतोय. या सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.. या सर्वेक्षणात एकूण चार टप्पे होते... ज्यात आधी चिंचोळ्या गल्यांचा सर्व्हे करण्यात आला.. घरांची नंबरींग करणं... त्यानंतर घरी प्रत्यक्ष जावून माहिती घेणे, कागदपत्रं तपासून घराचे क्षेत्रफळ मोजण्याची प्रक्रिया पार पडते.