Foreign Solo Traveller Shares 5 Shocking Things: भारतात दरवर्षी अनेक परदेशी पर्यटक भेट देत असतात. भारताला भेट देणारे परदेशी पर्यटक अनेकदा आपल्या देशाची संस्कृती, लोक आणि खाद्यपदार्थ पाहून प्रभावित होतात. सोशल मीडियावर असे अनेक परदेशी पर्यटक आहेत, जे भारतभर फिरत आपले अनुभव शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका विदेशी पर्यटक तरुणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ही तरुणी भारतभर एकट्याने फिरली अन् त्यानंतर तिने आलेले 5 महत्त्वाचे अनुभव शेअर केले आहेत. तरुणीने सांगितलेल्या या अनुभवाने नेटकरीही चकित झाले असून व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तरुणीने नेमकं काय सांगितलं?
१. मदतीसाठी नेहमी तयार असणारे लोक: माया रे हिने सर्वप्रथम भारतातील लोकांची प्रशंसा केली. ती म्हणाली की येथील लोक खूप मदत करणारे आहेत. जर कोणाला मदतीची गरज असेल, तर ते लगेच मदतीसाठी पुढे येतात.
२. सर्वत्र इंग्रजीचा वापर: तिने असेही नमूद केले की भारतातील बहुतेक लोकांना इंग्रजी समजते आणि बोलता येते. यामुळे तिला वाहतुकीची सोय करणे आणि जेवण मागवणे खूप सोपे झाले.
३. संभाषणाची एक वेगळी संस्कृती: माया म्हणाली की भारतातील लोक अनेकदा वय, लग्न किंवा उत्पन्न यांसारखे थेट वैयक्तिक प्रश्न विचारतात. हा तिच्यासाठी थोडा वेगळा अनुभव होता कारण तो सामान्य संभाषणापेक्षा वेगळा असतो.
४. देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रवास: तिच्या असेही लक्षात आले की भारतात देशांतर्गत पर्यटन खूप जास्त आहे. येथील लोक आपल्याच देशात मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात, जे तिला खूप मनोरंजक वाटले.
५. स्वादिष्ट आणि अस्सल जेवण: भारतीय जेवणाचे कौतुक करताना ती म्हणाली की, इथले जेवण खूप स्वादिष्ट आणि अस्सल आहे. "भारत सोडल्यापासून मला इतके चविष्ट जेवण कुठेही मिळाले नाही."
नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया
माया रेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला १२ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युझरने लिहिले, "मी सुद्धा एकटीने भारतभर प्रवास केला आहे आणि माझा अनुभव खूप छान होता." दुसऱ्याने म्हटले, "तुम्ही सर्व मुद्दे खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहेत, मला आशा आहे की तुम्ही पुन्हा भारताला भेट द्याल." आणखी एका युझरने सुचवले की, तिने पुढच्या वेळी नक्कीच कोलकाताला भेट द्यावी.