सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओमध्ये एका जोडप्याने हायवेच्या कडेला आपली कार पार्क (Park) केली. त्यानंतर थेट रस्त्यावरच स्वयंपाक (Cooking) करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे बेजबाबदार कृत्य केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढू शकते, अशी टीका नेटकरी करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कुणी कधी काय करेल याचा नेम नसतो त्याचा प्रत्यय या निमित्ताने आला. या जोडप्यावर सध्या टीकेची झोड उठली आहे.
नेमके काय आहे व्हिडिओमध्ये? (What exactly is in the video?)
व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपे रस्त्याच्या अगदी कडेला आपली कार उभी करून स्वयंपाक करत आहे. महिला रस्त्यावर चपात्या लाटत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजी शिजवण्याचे काम सुरू आहे. जेव्हा या जोडप्याला त्यांच्या या कृतीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी हा 'विश्रांती क्षेत्र' (Rest Area) असल्याचं सांगितलं. ऐवढेच नाही तर येथे स्वयंपाक करण्याची परवानगी असल्याचा दावा केला. मात्र, रस्त्याच्या कडेला अशाप्रकारे स्वयंपाक करणे अत्यंत धोकादायक आहे. शिवाय अशी परवानगी कोण देतो हा प्रश्नही निर्माण होत आहे.
नेटकऱ्यांकडून टीका (Criticism from Netizens)
हा व्हिडिओ @Nalanda_index या अकाउंटवरून सोशल मीडियावर पोस्ट (Post) करण्यात आला आहे. तो वेगाने व्हायरल (Viral) होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या जोडप्यावर तीव्र टीका केली आहे. हायवेवर (Highway) अशाप्रकारे कृती करणे हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. अनेक युजर्सनी (Users) चिंता व्यक्त केली आहे की, यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अपघाताची (Accident) शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. एका युजरने म्हटले आहे की, "भारतासारख्या देशात नागरिकांचा जीव हा महत्वाचा आहे. तो कोणी खरेदी करू शकत नाही." असं म्हटलं आहे.
सार्वजनिक जबाबदारीचा मुद्दा (The Issue of Public Responsibility)
अनेक लोकांनी या घटनेवर कमेंट (Comment) करताना सार्वजनिक ठिकाणांचा योग्य वापर आणि स्वच्छता राखणे ही केवळ नियमांची बाब नसून, नागरिकांची जबाबदारी आहे, असे मत व्यक्त केले आहे. महामार्गावर प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा विचार न करता अशाप्रकारे कृती करणे, हे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. अशा घटनांवर प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणीही यानिमित्ताने जोर धरत आहे.
Civic sense is a rare luxury in India , something not everyone seems able to afford. Take this scene for example: a family has started cooking right in the middle of road , turning the area messy. Tell me honestly, is this acceptable? pic.twitter.com/Xytjpv2DlS
— The Nalanda Index (@Nalanda_index) December 8, 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world