
Pakistan's prime minister Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे शरीफ यांच्यावर नाव बदलण्याची वेळ येऊ शकते. जाहीर भाषणाच्या दरम्यान आक्रमक वक्तव्य करण्याच्या नादात वाहवत जाण्याचा शरीफ यांचा इतिहास आहे. त्यांनी एका सभेत बोलताना भारताला पराभूत केलं नाही तर माझं नाव बदला, असं आव्हानच दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील डेरा गाझी खानमध्ये झालेल्या एका सभेत शरीफ चांगलेच जोशात होते. त्यांनी उत्साहाच्या भरात भाषण करताना स्टेजवरुन उडी मारली. पोडियमवर मूठ आदळले. तसंच हाताची मूठ उंचावत समर्थकांना उत्साहित करण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तान सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी दिवस रात्र काम करत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, असा दावा त्यांनी या भाषणात केला. या वक्तव्यानंतर लगेच ते आक्रमक झाले. 'आमच्या प्रयत्नांमुळे पाकिस्ताननं विकासाच्या मुद्यावर भारताला मागे टाकलं नाही, तर माझं नाव बलला. असं त्यांनी सांगितलं.
🛑🛑 If I don't defeat India, my name is not Shehbaz Sharif.
— Naren Mukherjee (@NMukherjee6) February 23, 2025
We will defeat regional competitors like India in economic development.”
— Pakistan's Prime Minister
👉 Ek din isko heart attack aa jayega jitna panic hokar bolta hai. 😂😂😂👇 pic.twitter.com/IN0Cy2EQbm
शहबाज यांनी या भाषणात त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचाही उल्लेख केला. ते यावेळी म्हणाले की, मी नवाज शरीफ यांचा फॅन आणि अनुयायी आहे. आज मी त्यांची शपथ घेऊन सांगतो की माझ्यामध्ये शक्ती असेपर्यंत आपण सर्वजण मिळून पाकिस्तानला महानतेपर्यंत नेण्यासाठी आणि भारताला पराभूत करण्यासाठी काम करू असे शहबाज यावेळी म्हणाले.
( नक्की वाचा : IND vs PAK : विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या बॅटिंगचं काय आहे रजनीकांत कनेक्शन? पाहा Video )
शहबाज शरीफ यांनी डेरा गाझी खानला दिलेल्या भेटीमध्ये त्या भागातील लोकांसाठी काही आवश्यक प्रकल्प सुरु करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानला अनेक वर्षांपासून गंभीर आर्थिक आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तान मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय कर्जाच्या ओझ्याखाली अडकलाय. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं भाषण सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या भाषणावर नेटीझन्स मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. प्रत्यक्षात कोणतंही काम न करता पोकळ आश्वासनं देणारे नेते, या शब्दात बऱ्याच जणांनी त्यांची टिंगल केली आहे.
विशेष म्हणजे शरीफ यांनी भारताला पराभूत करण्याचं वक्तव्य करण्याच्या एक दिवस आधीच भारताशी चर्चा सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर पाकिस्तान त्यांच्या जमिनिवरुन दहशतवादाला थारा देणे बंद करत नाही, तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही. दहशतवाद आणि चर्चा या दोन गोष्टी एकाच वेळी शक्य नाही असं भारत सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world