अनुज रायते, प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. त्यांनी निवडणुकीचा प्रचार आत्तापासूनच सुरु झाला आहे. या निवडणुकांच्या तोंडावर भाषावादाचा प्रश्न चांगलाच तापलाय. 'हिंदी विरुद्ध मराठी' विषयावरील आरोप-प्रत्यारोप, प्रादेशिक अस्मिता या मुद्यांवर मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण, मुंबईकरांना रोज भेडसवणाऱ्या नागरी समस्यांकडं दुर्लक्ष केले जात आहे. त्या समस्या जैसे थे आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वर्षांनुवर्षे प्रश्न जैसे थे
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न वर्षानुवर्ष तक्रारी करुनही जैसे थे आहे. मुंबईच्या आतील भागातील गल्लीबोळ किंवा सांताक्रूझ आणि विलेपार्ले उड्डाणपुलांसारखे महत्त्वाचे रस्ते दर पावसाळ्यात तीच परिस्थिती कायम असते. स्त्यांची जेमतेम डागडुजी केली जाते, पण ती टिकत नाही. पश्चिम उपनगरातील एका रहिवाशाने सांगितले, “ते फक्त दगड टाकून निघून जातात. अशा डागडुजी केलेल्या रस्त्यांवर ब्रेक व्यवस्थित लागत नाहीत आणि अपघात होणे सामान्य आहे.”
सामान्य मुंबईकरांप्रमाणे काही माजी नगरसेवकांनीही या विषयावर चिंता व्यक्त केली आहे. मकरंद नार्वेकर यांनी नुकतेच BMC आयुक्तांना पत्र लिहून, नागरी संस्थेच्या खड्डे ट्रॅकिंग ॲपमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
( नक्की वाचा : BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ! 'हे' कारण ठरणार अडथळा )
'' हे ॲप प्रभागानुसार किंवा शहरानुसार नोंदवलेल्या, दुरुस्त केलेल्या किंवा प्रलंबित खड्ड्यांचा डेटा दर्शवत नाही. यामुळे शासनात लोकांच्या सहभागाचा उद्देश पूर्ण होत नाही. वडून आलेले प्रतिनिधी नसताना, BMC ने पारदर्शकता आणि जबाबदारी दाखवणे अधिक महत्त्वाचे आहे,'' असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते निरंजन शेट्टी म्हणाले की, नागरी समस्या पक्षासाठी प्राधान्यक्रमावर असतील. “जो कोणी पुढचा महापौर होईल, त्याचे पहिले काम स्वच्छता, खड्डे आणि वीज यांसारख्या समस्या सोडवणे असेल. आम्ही खड्डेमुक्त रस्त्यांसाठी नवीन तंत्रज्ञान वापरू,” असेही त्यांनी सांगितले.
( नक्की वाचा : BMC School : मुंबई महापालिकेच्या मराठी शाळेत पहिली ते सातवी, एक वर्ग आणि 1 शिक्षक! कधी जाग येणार? )
'तो' लक्ष विचलित करण्याचा मार्ग
सध्या सुरु असलेला भाषावाद हा केवळ लक्ष विचलित करण्याचा मार्ग आहे, अशी शंका सामाजिक कार्यकर्ते चेतन कांबळे यांनी व्यक्त केली. मराठी महत्त्वाची आहे, पण निवडणुका नागरी समस्यांवर लढल्या पाहिजेत. हिंदी विरुद्ध मराठीवर नाही. खड्ड्यांमुळे लोक मरत आहेत, आणि फक्त सुमारे 2,000 किलोमीटर रस्त्यांना योग्य रीसर्फेसिंगची आवश्यकता आहे. याकडे लक्ष का दिले जात नाही?'' असा सवाल त्यांनी केला.
मुंबईकर अतुल काळे यांनीही कांबळे यांनी मांडलेल्या मुद्यावर सहमती दर्शविली आहे. आ “आम्ही 40 वर्षांपासून त्याच मुद्द्यांवर भांडत आहोत. शाळा, शिक्षण, बेरोजगारी, या खऱ्या समस्या आहेत. कुणी
हिंदी बोलतो की मराठी? ' हा मुद्दा नाही.
मुंबईतील रहिवाशांच्या आणखी एका गटानं या विषयावर निराशा व्यक्त केली. “BMC निवडणुका नेहमीच समस्यांवर लढल्या जात होत्या, यावेळेस नाही. हे अस्मितेचे राजकारण शहराला मदत करत नाही. आम्हाला स्वच्छ रस्ते, व्यवस्थित गटारे आणि कार्यरत रुग्णालये हवी आहेत, फक्त भाषणे नको,” असे ते म्हणाले.
राजकीय चर्चा अस्मिता आणि भावनांकडे वळत असताना, मुंबईचे रस्ते, अक्षरशः, दबावाखाली चिरडले जात आहेत. मतदार नागरी समस्यांवर उत्तरे मागतील की केवळ घोषणाबाजीने भुलतील, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मुंबईतील राजकीय चर्चा अस्मिता आणि भावनांकडे वळत असताना, शहराचे रस्ते दबावाखाली चिरडले जात आहेत. मराठी अस्मितेची भाषा महत्त्वाची असली तरी, नागरी समस्या देखील पक्षांच्या अजेंड्यावर येतील की नाही? याकडे येणाऱ्या काळात मुंबईकरांचं लक्ष असेल.