
सुजाता द्विवेदी, प्रतिनिधी
BMC Election : राज्यात सध्या सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने प्रभाग रचनेची अंतिम मुदत 4 सप्टेंबरवरून वाढवून 6 ऑक्टोबर केली आहे. त्यामुळे आता निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. बीएमसीमध्ये प्रभागांची संख्या 227 च राहील आणि वॉर्ड रचना 2011 च्या जनगणनेनुसार निश्चित केले जाईल. या दोन निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईतील सर्वात मोठी राजकीय लढाई, बीएमसी निवडणुकीची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली आहे. सरकारने प्रभाग सीमानिश्चितीची मुदत वाढवल्याने विरोधक सरकारवर निशाणा साधत आहेत की, "मैदान तयार आहे, जनता तयार आहे... मग सरकारला पराभवाची भीती वाटतेय का?" असा सवाल उपस्थित आहे. या निवडणुका आता नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होऊ शकतात, पण संभाव्य निवडणुका अशा प्रकारे एक महिना पुढे ढकलणे, हे तांत्रिक कारण आहे की सरकार जाणूनबुजून निवडणुका टाळत आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
विरोधकांचा आरोप
मुंबई महापालिकेच्या निवडणुका 4 महिन्यांमध्ये व्हाव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. पण, प्रभाग तयार करण्यात अडथळा येत असल्याचा दावा सरकारनं केला आहे. सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाचा अनादर केला जात आहे. इतका उशीर लागतोय याचा अर्थ निवडणुका 2026 मध्ये होतील. सध्या मुंबईकरांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत. याला जबाबदार कोण? आम्ही निवडणुका घेऊ शकत नाहीत हे सरकारनं स्पष्ट करावं. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा कोर्टाचा दरवाजा ठोठावू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी दिला आहे.
( नक्की वाचा : Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश )
भाजपाचं उत्तर
तर दुसरिकडं भाग पुनर्रचनेची प्रक्रिया ऑगस्टपर्यंत पूर्ण झाली, तर बीएमसी निवडणुकीची घोषणाही ऑगस्टपर्यंत शक्य आहे. अशा स्थितीत मुंबईकरांना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आपल्या नगरसेवकांची निवड करण्याची संधी मिळू शकते, असं मत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केलं आहे. प्रभाग रचना अंतिम टप्पात असून ती वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असं सरकारनं स्पश्ट केलंय.
मुंबई महापालिका निवडणुकीची तारीख पुन्हा पुढे जाण्यामागे अनेक कारणे आहेत
राज्य सरकारने अ, ब आणि क श्रेणीतील महानगरपालिकांच्या प्रभाग सीमानिश्चितीची अंतिम तारीख 4 सप्टेंबरवरून वाढवून 6 ऑक्टोबर केली आहे, तर ड श्रेणीसाठी ती 19 ऑक्टोबर आहे. आता बीएमसीसह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणुका दिवाळीनंतर, नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.नगरपालिका परिषदांसाठी मसुदा (ड्राफ्ट) सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की बीएमसीमध्ये प्रभागांची संख्या 227 च राहील; महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेले 236 प्रभागांचे निर्णय रद्द करण्यात आले आहेत.
प्रभागरचना पूर्णपणे 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित असेल, सध्याच्या मतदार संख्या किंवा लोकसंख्येनुसार नाही. प्रत्येक प्रभागाची सरासरी लोकसंख्या, बीएमसीच्या एकूण लोकसंख्येला 227 जागांमध्ये वाटून निश्चित केली जाईल. नगर विकास विभागाने सर्व नगर आयुक्तांना निर्देश दिले आहेत की, निश्चित वेळेत मसुदा सीमानिश्चिती तयार करून सादर करावी. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या प्रक्रियेत केवळ एक महिन्याचा विलंब होईल, यापेक्षा जास्त निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world