जाहिरात

Snake Village Of India: महाराष्ट्रात आहे सापांचं गाव, नागही आरामात फिरतात, 'त्या' ठिकाणाची आहे मोठी खासीयत

सापांची कोणाला भीती वाटत नाही.पण आपल्या देशात अशी एक जागा आहे, जिथे नागासारखे खतरनाक साप गल्लीबोळात आरामात फिरताना दिसतात. येथील लहान मुलं सापांना घाबरत नाहीत. लोक मानतात की,नागदेव त्यांची रक्षण करतात.

Snake Village Of India: महाराष्ट्रात आहे सापांचं गाव, नागही आरामात फिरतात, 'त्या' ठिकाणाची आहे मोठी खासीयत
Snake Village In Maharashtra

Snake Village of Maharashtra: सापांची कोणाला भीती वाटत नाही.पण आपल्या देशात अशी एक जागा आहे, जिथे नागासारखे खतरनाक साप गल्लीबोळात आरामात फिरताना दिसतात. येथील लहान मुलं सापांना घाबरत नाहीत. लोक मानतात की,नागदेव त्यांची रक्षण करतात.हेच कारण आहे की,याच जागेला स्नेक व्हिलेज ऑफ इंडिया म्हणतात. कुठे आहे ही जागा आणि काय आहे या जागेची खासीयत? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

महाराष्ट्रात कुठे आहे हे गाव?

महाराष्ट्राचं एक गाव आहे - शेतपाल. शेतपाल गाव सोलापूर जिल्ह्यात स्थित आहे. आपल्या अनोख्या परंपरेमुळं जगभरात प्रसिद्ध आहे. शेतपाल गावात लोक नाग सापाला इजा पोहोचवत नाहीत. अनेक घरांमध्ये सापांना राहण्यासाठी खास जागाही बनवल्या जातात. गावकरी मानतात की,नागदेवता त्यांचं रक्षण करतात. 

नक्की वाचा >> Ratnagiri News: मुंबईचr तरुण रत्नागिरीत मूळ गावी आला अन् भयानक घडलं, सख्ख्या बहिणीने पोलीस स्टेशनच गाठलं

मुलांनाही वाटत नाही सापांची भीती

या गावाच्या पारंपारीक घरांमध्ये देवस्थान नावाची एक छोटी जागा आहे.जिथे साप आराम करू शकतात.ही जागा नेहमी लाकूड किंवा मातीने बनवली जाते. गावातील मुलंही लहानपणापासून सापांसोबत खेळतात, असं म्हटलं जातं. पण त्यांना सावध राहणं शिकवलं जातं. 

इथे लोकांना चावत नाहीत साप

धक्कादायक बाब ही आहे की,एवढे साप असतानाही इथे साप चावण्याच्या घटना क्वचितच घडतात. गावातील लोकांना वाटतं की,माणूस आणि सापांमध्ये विश्वास आणि सन्मानाचं नातं बनलं आहे.शेतपाल गावात नागपंचमीचा उत्सव धामधुमीत साजरा केला जातो. याचदरम्यान, लोक नागदेवताची पूजा करतात आणि सापांना दूध पाजतात.

नक्की वाचा >>Good News: 'या' तारखेपासून रुग्णवाहिकेत मिळणार 'या' नव्या सुविधा, काय आहेत नियम? वाचा सर्व डिटेल्स

शास्त्रज्ञ काय सांगतात?

या गावाबाबत कळल्यावर अनेकांना धक्का बसतो. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की,साप तेव्हाच हल्ला करतात, जेव्हा त्यांना धोका वाटतो.गावकरी सापांना त्रास देत नाहीत. यासाठी त्यांच्यात कमी प्रमाणात टक्कर होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com