Manikrao Kokate : "मी तसं बोललोच नाही", वादग्रस्त वक्तव्यानंतर कृषिमंत्र्यांची सारवासारव

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, बऱ्याच ठिकाणी पेरणी संपली आहे. फळबागाचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे फळबागाचे पंचनामे करण्याचे सांगितले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Manikrao Kokate Statement : राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडला आहे.  शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी कृषिमंत्री त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी "अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कशाचे ढेकळाचे पंचनामे करायचे का?" असे वादग्रस्त विधान कृषिमंत्र्यांनी केले आहे. मात्र आता, मी तसं बोललोच नाही, अशी सारवासारव कृषिमंत्र्यांनी केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, बऱ्याच ठिकाणी पेरणी संपली आहे. फळबागाचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे फळबागाचे पंचनामे करण्याचे सांगितले आहे. काही ठिकाणी कांद्याची लागवड केल्याने, कांद्याचे नुकसान झाले आहे. जेवढं नुकसान झाला आहे, तेवढे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसान भरपाई देणार आहे. 

( नक्की वाचा-  Political News : सांगलीत ठाकरे गटाला धक्का, चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?)

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नांगरलं आहे, शेतीची मशागत करण्यासाठी नांगरणी करावीच लागते. आता सोयाबीन, कापूस शिल्लक आहे का? त्यामुळे फळबागा उभ्या आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. तुम्ही त्या शब्दाचा अर्थ वेगळा काढला. ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाही त्या ठिकाणी पंचनामे करून काय करणार? कांदे आणि फळ पिकाची पंचनामे करण्यास सांगितले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झालं त्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.  

ज्या पिकांचं नुकसान होईल त्या पिकाची नुकसान भरपाई शासनातर्फे दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मालच नाही त्याचे पंचनामे कसे करायचे. जे काही खरं आहे ते मी बोललो आहे. ठीक आहे चुकलं असेल, पण तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढत आहात. मी काही वेगळं बोललो नाही, जे सत्य आहे तेच बोललो. ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करण्याबाबत मी बोललो आहे, अशी सारवासारव कृषिमंत्र्यांनी केली. 

Advertisement

(नक्की वाचा-  Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात? नवी माहिती समोर)

काय म्हणाले होते कृषिमंत्री माणिकराव कोकाटे?

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी सायंकाळी सिन्नर तालुक्यात पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची  पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने पंचनाम्यांबाबत केलेल्या प्रश्नावर कोकाटे यांनी 'काढलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करायचे ? ढेकळाचे पंचनामे करायचे का? असा सवाल शेतकऱ्यालाच विचारला. तसेच शेतात पडलेल्या कांद्याचे पंचनामे केले जातील घरात काढून ठेवलेल्या कांद्याचे पंचनामे करायचे हे नियमात बसत नाही' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Topics mentioned in this article