नवी मुंबईत पोलीस भरतीदरम्यान एकाचा मृत्यू; तर 6 जण प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

जळगावमधील अमेळनेरचा अक्षय भरतीसाठी आला होता. एसआरपी. भरती ग्रुप क्रमांक 11 या ठिकाणी धावपट्टीवर धावत असताना अक्षय मैदानात कोसळला.

Advertisement
Read Time: 2 mins

नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका 23 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.अक्षय बिऱ्हाडे असं या तरुणांचं नाव होतं. पोलीस भरतीदरम्यान आणखी सहा जणांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रकृती बिघडलेल्या सहापैकी एकाची तब्येत सुधारली असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एक जण गंभीर असल्याची माहिती  माहिती ठाणे महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. अमित गायकवाड याला डिस्चार्ज मिळाला आहे. तर 29 वर्षीय प्रेम ठाकरे याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तर पवन शिंदे, अभिषेक शेटे, सुमित अडतकर, साहील लवान या तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

(नक्की वाचा- बीडमधील शिवसेनेच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी, ते प्रकरण भोवलं)

अक्षय बिऱ्हाडेसोबत नेमकं काय घडलं? 

जळगावमधील अमेळनेरचा अक्षय भरतीसाठी आला होता. एसआरपी. भरती ग्रुप क्रमांक 11 या ठिकाणी धावपट्टीवर धावत असताना अक्षय मैदानात कोसळला. त्यानंतर अत्यावस्थ अवस्थेमध्ये त्याला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

( नक्की वाचा : 'भाग मच्छर भाग' साठी बॉलीवूड कलाकारांची मदत घेणार, मराठी कलाकार आणि सेलिब्रिटीही सहाय्य करणार )

अक्षय 500 मीटरचा टप्पा धावून पूर्ण करण्याच्या आधीच मैदानात कोसळला. त्याच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत, असा आरोप त्याच्या नातेवाईंकांनी केला आहे. अक्षयला हृदयविकाराचा झटका आला की इतर कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला, हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल. 
 

Advertisement
Topics mentioned in this article