
मावळच्या कुंडमळ इथं इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण अजून ही बेपत्ता आहेत. 38 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे. जर हा पूल धोकादायक होता तर त्या ठिकाणी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कोणतीही पावलं का उचललं नव्हती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय पोलिस त्या ठिकाणी का नव्हते अशी ही विचारणा होत आहे. यावर आता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र हुडी यांनी स्पष्टीकरण देताना, सर्वच गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र हुडी यांनी दुर्घटना स्थळी भेट दिली. शिवाय परिस्थितीचा आढावाही घेतला. यावेळी त्यांनी NDTV मराठीला महत्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की ही दुर्घटना जवळपास सव्वा तीन वाजता घटली. त्यानंतर कंट्रोल रूमला याबाबत साडे तीन वाजता कळवण्यात आलं. त्यानंतर तातडीने रेस्क्यू टीम घटना स्थळी पाठवण्यात आली. ही टीम वीस मिनिटात तिथे पोहचल्याचा दावा हुडी यांनी केला.
ट्रेंडिंग बातमी - Pune Bridge collapses: कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कसा कोसळला? कारण आलं समोर
रेस्क्यू टीम तिथे विस मिनिटात पोहोचल्यामुळे तिथे अडकलेल्या 38 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. त्यांचे जीव वाचले. मात्र त्याच वेळी दोन मृतदेह हाती लागले आहेत. दोन जण मिसींग असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांचा शोध घेतला जात असल्याचं ही के म्हणाले. इथं जवळपास 250 जणांची टीम कॉडिनेशनमध्ये काम करत आहे. जोपर्यंत आमची खात्री होत नाही तो पर्यंत बचाव कार्य सुरू राहाणार असल्याचंही हुडी यांनी यावेळी स्पष्ट केलं. सोमवारीही बचाव कार्य सुरू राहील असं ते म्हणाले.
जो पूल कोसळला त्या पुलावर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. क्षमते पेक्षा जास्त लोक पुलावर आल्यामुळे तो कोसळला असे ही हुडी यांनी सांगितलं. शिवाय हा पूल धोकादायक आहे. त्यामुळे इथं प्रतिबंधात्मक आदेशही मान्सूनपूर्वी काढल्याचा दावा हुडी यांनी केला. इथं पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली होती. शिवाय त्याबाबतचा सूचना फलक ही लावण्यात आला. दोन पोलिसही त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. पण या सर्वाकडे पर्यटकांना दुर्लक्ष केले असं ही हुडी यांनी स्पष्ट केलं. पावसाळ्यात अशी ठिकाणं ही धोकादायक असतात. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या सुचनांकडे पर्यटकांनी लक्ष देणं गरजेचं असल्याचं ही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे अशा ठिकाणी जाणं टाळा असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world