
आज आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरातून वारकरी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मात्र काल १८ जूनच्या मध्यरात्रीपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहताना दिसत आहे. आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी जवळच्या परिसरामधील दोन्ही घाटांमध्ये उभ्या असलेल्यांना वारकऱ्यांना तेथून दूर करण्यात आलं आहे. दरम्यान एक अपघात होता होता टळला आहे.
इंद्रायणी नदीवर स्नान करण्यासाठी एक वारकरी तेथे आला होता. याचं नाव अमित तुकाराम राठोड (४०) आहे. तो मूळचा यवतमाळचा आहे. स्नान करीत असताना वारकरी वाहून जात होता. स्नान करताना NDRF ने जवळजवळ पाच किलोमीटरवरून या वारकऱ्याला रेस्क्यू केलं आहे. तो वाहून जात असताना NDRF बटालियन क्रमांक ५ च्या टीमने सतर्कता बाळगत त्याला वेळीच नदीतून बाहेर काढले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world