विशाल पाटील, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. प्रत्येकाचे ध्येय मुंबई महानगरपालिका काबीज करणे हेच आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय शाखाध्यक्ष समितीचा आढावा घेतला. या बैठकीत केंद्रीय समितीत काम करणाऱ्या सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोर काही तक्रारी समोर आणल्या. यामध्ये प्रामुख्याने अनेक विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्ष हे काम करत नाहीत, अशा पद्धतीची तक्रार या समितीने राज ठाकरे यांच्यासमोर मांडली.
यावर राज ठाकरे यांनी थेट या समितीला आदेश दिले की जे शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष काम करत नाहीत त्यांच्या जागी तात्काळ पर्याय शोधा आणि 30 जूनला पर्यायासह अहवाल माझ्यासमोर मांडा. या बैठकीत ज्या पद्धतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जो आदेश दिलेला आहे या आदेशावरून ऐन निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच मनसेत आता बदलाचे वारे वाहणार आहेत.
(नक्की वाचा- Raja Raghuvanshi murder: राजाच्या हत्येपूर्वी काय घडलं? सोनमसोबतचा शेवटचा VIDEO आला समोर)
जे विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्ष काम करत नाहीत अशांना पदावरून हटवलं जाणार हे आता स्पष्ट होतंय. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसेत अनेक अंतर्गत बदल होतील असे चित्र सध्या स्पष्ट होत आहे. मनसेकडून वेगवेगळ्या स्तरावरती केंद्रीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष , उपशाखाध्यक्ष, गटाध्यक्ष अशा पद्धतीच्या या केंद्रीय समित्या स्थापन करून पक्षातील स्थानिक पातळीवरील आढावा या समित्या घेत आहेत.
(नक्की वाचा- Indrayani River Bridge Collapse: अजित पवार असंवेदनशील? लोकांचा जीव गेला, पालकमंत्री कारखाना निवडणुकीत व्यस्त
दोन्ही ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चा आणि पक्षात बैठकांचे सत्र
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का याच्यात जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र या चर्चा जरी सुरू असल्या तरी दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षातल्या बैठकांचं सत्र सुद्धा तितक्याच वेगाने सुरू आहे. रविवारी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शाखाप्रमुख , महिला पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कामाचं नियोजन आणि काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन शिवसैनिकांना केलं. तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय शाखाध्यक्ष समितीचा आढावा घेतला आणि स्पष्ट आदेश दिले त्यामुळे निवडणुकीच्या बाबतीत दोन्ही बंधूंनी कंबर कसली आहे