Sharad Pawar Speech : "...त्याची किंमत देशाला द्यावी लागते", शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा

पक्षात फूट पडेल असे कधी वाटले नव्हते. फुटीची चिंता करू नका, जे गेले त्याबद्दलची चिंता करू नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेबद्दलची बांधिलकी कायम राखली तर काहीही अडचण येणार नाही, असं आश्वासन देखील शरद पवारांनी यावेळी दिलं. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Sharad Pawar Speech : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाण साधला आहे. भारताच्या शेजारील देशांमध्ये आणि भारतात सुसंवाद आहे, अशी स्थिती नाही. याचा अर्थ असा आहे की देशाचे नेतृत्व करणाऱ्या घटकांनी सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही आणि त्याची किंमत देशाला द्यावी लागते, अशा कडक शब्दात शरद पवारांनी आपलं मतं मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवार यांनी म्हटलं की, पहलगाममध्ये जे काही घडलं त्यामागे कोण आहे याची चर्चा देशात झाली.  त्यावेळी आम्ही सरकारवर टीका केली नाही, आम्ही देशाच्या भूमीवर, नागरिकांवर हल्ले होत असतील तर त्याला सामोरे जाण्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर आम्ही त्याचे समर्थन करू ही भूमिका घेतली होती. तेच काम आपल्या लोकांनी केले. आज गांभीर्याने या सगळ्या प्रश्नांचा विचार करायला हवा. सबंध देशाचे चित्र बघितलं तर चीन, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका तर हे शेजारी देश आणि आपण यांच्यातील स्थिती काय आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - Jayant Patil : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठा ड्रामा, जयंत पाटलांनी उडवून दिली खळबळ)

एककाळ असा होता जेव्हा जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व आणि भारत सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा देश म्हणून भारताचा लौकीक होता. आज आपले संबंध पाकिस्तान, चीन, बांगलादेशशी चांगले नाहीत. बांगलादेशच्या प्रमुखांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. ते मंत्रिमंडळ अथवा सत्तेत नव्हते तेव्हा ते पुणे शहरात माझ्यासोबत आले होते. बांगलादेशसाठी भारताने इतका त्याग केला तोही आपल्यासोबत नाही, श्रीलंकेवरही चीनचा प्रभाव आहे. भारताच्या शेजारी देशांत आणि भारतात सुसंवाद आहे अशी स्थिती नाही. याचा अर्थ असा आहे की देशाच्या नेतृत्व करणाऱ्या घटकांनी सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही आणि त्याची किंमत देशाला द्यावी लागते, असं शरद पवार यांनी म्हटलं. 

Advertisement

(नक्की वाचा-  'आम्ही एका ताटात जेवलो, ते विसरले असतील पण मी नाही विसरणार', NCP वर्धापनदिन सोहळ्यात सुप्रिया सुळेंचा टोला)

कार्यकर्त्यांचं कौतुक 

आपल्या भाषणात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचंही कौतुक केलं. कार्यकर्ते हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मौल्यवान ठेवा आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंध राहून विचारांना पुढे नेतील तर सत्तेची चिंता करू नका. सत्ता आपोआप येईल. ती येण्याची स्थिती मला महाराष्ट्रात दिसते आहे, असं आश्वासक वक्तव्य करून कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्जा भरली. 
 
फुटीची चिंता करू नका

Advertisement

पक्षात फूट पडेल असे कधी वाटले नव्हते. फुटीची चिंता करू नका, जे गेले त्याबद्दलची चिंता करू नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेबद्दलची बांधिलकी कायम राखली तर काहीही अडचण येणार नाही, असं आश्वासन देखील शरद पवारांनी यावेळी दिलं. 

Topics mentioned in this article