पालघरमध्ये दोन विचित्र अपघातात 4 जणांचा मृत्यू, तर 4 जखमी

पाली - विक्रमगड मार्गावर आलोंडे नाका येथे भरधाव ट्रकने  एस्टी बस,  दोन मोटारसायकल आणि कारला धडक दिली. तर वसई पूर्वेच्या सातीवली येथे घटली. यामध्ये भरधाव डंपरने पाच महिलांना चिरडले.

Advertisement
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर

पालघरमध्ये दोन अपघातांच्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. वसई पूर्व परिसरात डंपरने पाच महिलांना चिरडलं. तर पाली - विक्रमगड मार्गावर आलोंडे नाका येथे भरधाव ट्रकने एसटी बस, कार आणि दुचाकीला धडक दिली. दोन्ही घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत. 

पाली - विक्रमगड मार्गावर आलोंडे नाका येथे भरधाव ट्रकने  एस्टी बस,  दोन मोटारसायकल आणि कारला धडक दिली. त्यानंतर ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. या विचित्र अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. अपघातात आलोंडे गावातील लखमा वाघ आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.  ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. 

दुसरी घटना वसई पूर्वेच्या सातीवली येथे घटली. यामध्ये भरधाव डंपरने पाच महिलांना चिरडले. मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्त्यावर सर्वत्र वाहतूक कोंडी सुरू आहे. अशाच वाहतूक कोंडीतून भरागाव वेगात मार्ग काढणाऱ्या डंपर उलट दिशेने येऊन त्याने अनेकांना चिरडले. या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्या आहेत.

मंजिता जितू सरोज (वय 35) आणि जिंदादेवी शैलेश सिंग (वय 50) अशी मृत महिलांची नावे आहेत. भरधाव डंपरने दोन खाजगी बस आणि एका टँकरला देखील धडक दिली. पोलिसांना डंपर चालकाला ताब्यात घेतल आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article