जाहिरात

Archana Tiwari: रक्षाबंधनासाठी निघाली, पण घरी पोहोचलीच नाही, 12 दिवस झाले, पोलीस म्हणतात...

राहुल कुमार लोढा यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, 20 ते 25 पोलिसांची तीन पथके बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध घेत आहेत.

Archana Tiwari: रक्षाबंधनासाठी निघाली, पण घरी पोहोचलीच नाही, 12 दिवस झाले, पोलीस म्हणतात...

Archana Tiwari missing News: इंदूरमध्ये राहून सिव्हिल जजच्या परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थिनी अर्चना तिवारीचा 12 दिवस पासून कोणताही सुगावा लागलेला नाही. गेल्या 7 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन  करण्यासाठी ती इंदूरहून आपल्या मूळ गावी कटनीला जाण्यासाठी निघाली होती. यासाठी ती इंदूर स्टेशनवरून इंदूर-बिलासपूर ट्रेनमध्ये बसली होती. पण जेव्हा ट्रेन कटनीला पोहोचली तेव्हा अर्चना तिथे नव्हती. आता असा संशय व्यक्त केला जात आहे की अर्चना मिडघाटच्या जंगलात कुठेतरी पडली असावी. याच कारणामुळे जीआरपी (GRP) आणि वन विभागाचे पथक जंगलात शोधमोहीम राबवत आहे. मिडघाट जंगल बुदनी ते बरखेडा दरम्यान आहे. दरम्यान, भोपाळ रेल्वे विभागाचे एसपी (SP) राहुल कुमार लोढा स्वतः या बेपत्ता प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. राहुल कुमार लोढा यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, 20 ते 25 पोलिसांची तीन पथके बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध घेत आहेत.

मिडघाटच्या जंगलातही शोधमोहीम

एसपी लोढा यांनी सांगितले की ती बेपत्ता आहे की काही कटकारस्थान घडले आहे या दोन्ही अँगलने पोलिस तपास करत आहेत. अर्चनाचे शेवटचे लोकेशन इटारसीजवळ मिळाले आहे. तिने शेवटचे मोबाईलवर भोपाळमध्ये आपल्या कुटुंबियांशी बोलणे केले होते. सहप्रवाशांच्या मते, भोपाळपर्यंत अर्चना सीटवरच होती. आता मिडघाट जंगलाचा संशय आल्यामुळे त्या भागात शोधमोहीम राबवली जात आहे. यामध्ये डॉग स्क्वॉडचीही मदत घेतली जात आहे.

नक्की वाचा - Top 10 movies: जुलै महिन्यातील टॉप 10 चित्रपटांची यादी आली समोर, 'सैयारा' कितव्या क्रमांकावर?

अपहरणाचा संशय नाही: पोलीस

पोलिसांनुसार, अर्चनाच्या अपहरणाची शक्यता खूप कमी आहे. कारण त्या दिवशी ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. लोक कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या आश्रमातून परत येत होते. अर्चना कायद्याचे शिक्षणही घेत असल्यामुळे कोणी तिला सहजपणे फसवून घेऊन जाईल याची शक्यताही कमी आहे. अर्चनाच्या कॉल डिटेल्स (CDR) ची देखील तपासणी केली जात आहे. जेणेकरून त्यातूनही काही सुगावा लागेल. पोलीस ज्या लोकांशी अर्चना बोलत होती त्यांचीही चौकशी करत आहेत. पोलिसांनी ट्रेनच्या टीसी, अटेंडर तसेच सहप्रवाशांचीही चौकशी केली आहे. याव्यतिरिक्त, अर्चना तिवारीच्या प्रवासाच्या मार्गावरील सर्व स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. सध्या ती कोणत्याही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेली नाही. इंदूर ते कटनीपर्यंतच्या सर्व स्टेशनवर शोध घेण्यासोबतच पोलिसांनी बिलासपूरच्या वाटेवर येणाऱ्या स्टेशनचीही तपासणी केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com