जाहिरात

Dharashiv News: तीन दिवसांवर लग्न! पण दुर्दैवाने सगळं स्वप्न भंगल, तरुणाबरोबर भयंकर घडलं

अचानक घडलेल्या या घटनेने लांडगे कुटुंबीयांवर आभाळ कोसळल्यासारखी अवस्था झाली आहे.

Dharashiv News: तीन दिवसांवर लग्न! पण दुर्दैवाने सगळं स्वप्न भंगल, तरुणाबरोबर भयंकर घडलं
धाराशिव:

ओंकार कुलकर्णी 

अवघ्या तीन दिवसांवर आलेलं लग्न. त्यामुळे घरात लग्नाची लगबग सुरू होती. तयारी आणि आनंद साजरा करण्याच्या योजना केल्या जात होत्या. लग्न घरात आनंदाचं वातावरण होतं. असं असतानाचा लग्न घरातल्या नवरदेवावरच काळाने घाला घातला. अन् क्षणात सर्व काही संपलं. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जाकेपिंपरी इथं ही दुर्दैवी घटना घडली. ज्या मांडवात लग्न लागणार होतं त्या मांडवात नवरदेवाचा मृतदेहा ठेवावा लागला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भैरवनाथ लांडगे हा मुळचा जाकेपिंपरी गावचा रहिवाशी. त्याचे वय २५ वर्षे होते. येत्या 22 जून रोजी त्याचं लग्न होणार होतं. घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होती. सर्व जण आनंद होते.  असं असतानाच ही अनपेक्षित घटना घडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भैरवनाथ लांडगे हा तरुण ‘झिरो लाईनमन' म्हणून स्थानिक पातळीवर वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्याच्या हाताखाली काम करायचा. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास गावातील विद्युत पोलवरील स्विच बदलण्याचे काम करण्यासाठी तो गेला होता. त्यावेळी त्याला अचानक विजेचा शॉक लागला. यात  त्याचा जागीच मृत्यू झाला.

ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Politics: आवाज कुणाचा? वर्धापनदिनी शिंदेंचा ठाकरेंना दे धक्का; बड्या नेत्यांचे पक्षप्रवेश

अचानक घडलेल्या या घटनेने लांडगे कुटुंबीयांवर आभाळ कोसळल्यासारखी अवस्था झाली आहे. तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून अनेकांनी समाज माध्यम व प्रत्यक्ष भेटून शोक व्यक्त केला आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेले लग्न अन् त्याआधीच झालेले हे दुर्दैवी निधन. यामुळे गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. होणाऱ्या नवरीला ही बातमी समजल्यानंतर तिच्यावर आभाळ कोसळले. हाताला मेहंदी आणि हळद लागण्या आत तिच्यावर हा प्रसंग आला. 

ट्रेंडिंग बातमी - Bachchu Kadu: बच्चू कडूंना दिलासा नाहीच, जिल्हा बँक अपात्रता प्रकरण, न्यायालयात काय घडलं?

याच प्रकरणाच्या माध्यमातून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या या खासगी कर्मचाऱ्यांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यांना ना कोणी वाली आहे ना अशा घटना घडल्यास कुठल्या शासकीय मदतीचा हात. तरीही वीज वितरण कंपनीतील कर्मचारी असे शेकडो खासगी कामगार हाताखाली घेऊन त्यांच्या जीवाशी खेळतानाचे चित्र जिल्ह्यात सर्रास पाहायला मिळत असून याला लगाम घालण्याची आवश्यकता आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com