
एक अंगावर काटा आणणारी ह्रदयद्रावक घटना जळगावच्या रावेरमध्ये घडली आहे. इथं वडीलांबरोबरच लेकीचा ही शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. रावेरच्या तासखेडा या गावात ही घटना घडली. वडीलांना शॉक लागतोय हे पाहील्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी लेक धावून गेली. पण तीही विजेच्या तारेला चिकटली आणि तिचाहा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. तर कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रावेर तालुक्यातील तासखेडा या गावात समाधान कोळी आपल्या कुटुंबासह राहातात. त्यांना मावनी ही मुलगी आहे. घरातील कपडे सुकविण्यासाठी बांधलेल्या तारांवर वीजेचा प्रवाह वाहात होता. त्याच वेळी समाधान यांचे वडील अशोक कोळी हे तारेवर टाकलेला रुमाल काढण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना जोरदार वीजेचा धक्का बसला. त्यामुळे ते एका बाजूला फेकले गेले. पण त्याच वेळी कपडे सुकण्यासाठी टाकलेली तारही तुटली.
त्याचवेळी समाधान कोळी ही तिथे होते. वडीलांना सावरायला जाताना समाधान कोळी हे ही त्या तारेच्या संपर्कात आले. त्यांनाही त्या तारेचा झटका बसला. त्यावेळी त्यांची मुलगी मानवी ही तिथेच होती. वडीलांनी शॉक लागला आहे हे तिला समजले. त्यामुळे ती त्यांना वाचवण्यासाठी धावली. पण ती वडिलांना वाचवू शकली नाही. तिही त्याच तारेला चिकटली गेली. तिथेच वडीलांबरोबर मुलीला ही वीजेचा जबरदस्त झटका बसून त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जातेय. समाधान अशोक कोळी वय 36 व मानवी समाधान कोळी वय 11 असे मृत्यू झालेल्या बापलेकींचे नाव आहे.
मुलगी मानवी हिने वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांसमवेत तिलाही तुटलेल्या तारा मुळे विजेचा धक्का लागल्याने दोघेही वीज प्रवाह असलेल्या ताराला चिटकले. सदर घटनेमुळे अशोक कोळी यांनी आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेत वीज प्रवाह खंडित करून समाधान कोळी व मानव कोळी यांना सावदा येथील खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही भुसावळ येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोघांनाही भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र भुसावळ येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान सदर घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली असून दोघांचीही मृतदेहावर भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. एकाच कुटुंबातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तासखेडा या गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळह व्यक्त केली जात आहे. समाधान कोळी हे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते तर मानवी ही शालेय शिक्षण घेत होती. मात्र घरात असलेल्या विजेच्या वायरिंग मधून शॉर्टसर्किट होऊन वीज प्रवाह हा कपडे सुकवण्याच्या तारात उतरल्यामुळे या पिता-पुत्रीला आपला जीव गमवावा लागला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world