लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी
जालन्यातून अत्यंत हादरवणारी घटना समोर आली आहे. जोशी कुटुंबातील तिन्ही मुलं महादेव मंदिरात जातो सांगून घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत. रात्र झाली तरीही तिघं घरी आले नसल्याने कुटुंबीय चिंतेत होतं. त्यांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसात जाऊन तक्रारही केली. शेवटी आज सकाळी जे वृत्त कानी पडलं ते पाहून कुटुंबाच्या पायाखालची जमिनच सरकली. तिन्ही लहानग्यांचा मृतदेह गावातील एका शेततळ्यात तरंगत असताना दिसला. या घटनेनंतर जाफ्राबाद तालुक्यातील वरुण गावात शोककळा पसरली आहे.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जोशा कुटुंब हादरलं..
जालन्यातील वरुड येथील बेपत्ता तिन्ही लहान मुलांचा शेततळयात बुडून मृत्यू झालाय. वरुड गावातील शेततळ्यात ही घटना घडली आहे. हे तिन्हीही मुलं महादेव मंदिरात दर्शनासाठी जातो म्हणून घराबाहेर पडले होते. काल २ जूनच्या रात्रीपर्यत ते घरी न आल्यानं त्यांचा शोध सुरू झाला होता. 14 वर्षीय यश जोशी, 7 वर्षीय रोहण जोशी आणि 9 वर्षीय दिपाली जोशी अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नाव आहेत.हे तिन्हीही मुलं एकाच कुटुंबातील असून या घटनेमुळे वरूडसह परिसरात शोककळा पसरली आहे.
नक्की वाचा - Dhule News : जमिनीवर आपटलं नंतर जमिनीत पुरलं; आईसमोरच दीड वर्षांच्या चिमुकल्याला सावत्र बापाने संपवलं
बेपत्ता झाल्यानंतर शोधशोध..
महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेले एकाच कुटुंबातील 3 लहान मुलं बेपत्ता झाल्याचं वृत्त आधी समोर आलं होतं. ही तिन्ही मुलं जाफ्राबाद तालुक्यातील वरुड गावातील रहिवासी आहेत. 14 वर्षीय यश जोशी, 7 वर्षीय रोहण जोशी आणि 9 वर्षीय दिपाली जोशी ही तिन्ही मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती.