Women's Safety : 'महाराष्ट्रात दर तासाला एक बलात्कार, दीड लाख महिला बेपत्ता'; आमदाराने दिली धक्कादायक आकडेवारी

Maharashtra News : महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान याबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

Maharashtra News Rape Case : पुण्यातील एका ४ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. ही घटना ताजी असताना महिला अत्याचाराच्या कित्येक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या. यानंतर महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान याबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

महाराष्ट्रात दररोज जवळपास २४ बलात्काराच्या घटना होतात. म्हणजे प्रत्येक तासाला एक बलात्कार. २०२५ मध्ये पोक्सोअंतर्गत १३,००० हून अधिक प्रकरणं दाखल झाली आहेत. यासह विनयभंग आणि महिलांवरील अत्याचाराच्या ५० हजारांहून अधिक प्रकरणं समोर आली आहेत. राज्यात तब्बल दीड लाख महिला-तरुणी बेपत्ता आहेत. ज्यामधील ३० हजार जणींबद्दल अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना धक्कादायक माहिती दिली.

नक्की वाचा - Ahilyanagar News : 23 वर्षांच्या प्रियाने 2 वर्षे भोगल्या मरणयातना; शेवटी जिथून पाठवणी केली तिथेच सोडला जीव!

रोहित पवारांनी राज्य सरकारविरोधात गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. सरकार गुन्ह्यांवर अंकुश लावण्याऐवजी पोलीस दलाचा उपयोग राजकीय विरोधकांना दाबणे आणि व्हिआयपी सुरक्षेसाठी करीत आहेत.

Advertisement

शक्ती कायद्यावरुन केंद्रावर निशाणा...

रोहित पवार यावेळी म्हणाले, संत आणि महापुरुषांच्या या पुरोगामी राज्यात महिलांचा सन्मान करायला शिकवलं जातं, अशा महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार होणं दुर्देवी आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना शक्ती कायदा लागू करण्यात आला होता. आमची मागणी आहे की, महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर एक विशेष सत्र बोलावून शक्ती कायदा पुन्हा लागू करावा.

चार्टशील दाखल करण्यात दिरंगाई...

रोहित पवार यांनी बदलापूर, चाकण, बीड, गोंदिया, बारामती आणि मावळ सारख्या घटनांचा हवाला देत सांगितलं की, अनेक प्रकरणात ९०  दिवसांनंतरही चार्टशीट दाखल करण्यात आली नाही. त्यांचा आरोप आहे की, या पीडितांना न्याय मिळवून देण्यात दिरंगाई केली जात आहे.