नागपुरात बस-रिक्षाच्या भीषण अपघातात 2 जवानांचा मृत्यू, चौघांवर रूग्णालयात उपचार सुरू

नागपूर जिल्ह्यातील कन्हानजवळील पुलावर बसची धडक लागून 18 जून रोजी सायंकाळी हा अपघात झाला.

Advertisement
Read Time: 1 min
नागपूर:

भारतीय सैन्याचे सहा जवान प्रवास करीत असलेल्या ऑटो रिक्षाच्या अपघातात दोन जवानांना मृत्यू झाला असून अन्य चार जवान जखमी आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

नागपूर जिल्ह्यातील कन्हानजवळील पुलावर बसची धडक लागून 18 जून रोजी सायंकाळी हा अपघात झाला. यात आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार दोन जवानांचा मृत्यू झाला असून अन्य चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर कामठीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे जवान एका तीन चाकी ऑटो रिक्षात बसून कामठी कॅन्टोन्मेंटकडे जात  असताना एका बसने धडक दिल्याने ऑटो रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. साध्या वेशात असलेल्या जखमी जवानांना आसपासच्या लोकांनी ऑटो रिक्षा मधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. रस्त्यावर बस चालकाच्या आणि ऑटो चालकाच्या निष्काळजीपणा मुळे हा दुर्दैवी अपघात घडला असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

बातमी अपडेट आहे.