नवरा कामावरून आला अन् मित्रांसोबत फिरायला गेला; चिडलेल्या पत्नीने एका क्षणात सर्व संपवलं!

पत्नीला फिरायला घेऊन गेला नाही याचा राग मनात धरून एका तरूणासोबत भयंकर घडलं.

Advertisement
Read Time: 2 mins
पालघर:

मनोज सातवी, प्रतिनिधी

पती फिरायला घेऊन गेला नाही याचा राग मनात धरून एका महिलेने (Women Killed daughter) आपल्याच साडेचार महिन्याच्या चिमुकल्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. पालघरच्या (Palghar Crime News) डहाणूतील सीसने येथील मनीषा जयेश राजड (23) असं या महिलेचे नाव आहे.  

मनीषाचा पती जयेश राजड हा मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करत असल्याने नेहमीच घराबाहेर असतो. पावसाळा सुरू होताच बोटी किनाऱ्यावर लागल्याने जयेश अपल्या घरी परतला. मात्र शनिवारी जयेश पुन्हा आपल्या मित्रांसोबत फिरायला गेला. या गोष्टीचा राग मनात धरून मनीषाने अतिशय टोकाचं पाऊल उचललं. मनीषाने सुरुवातीला आपल्या साडेचार महिन्याच्या अनुश्रीची गळा आवळून हत्या केली.  त्यानंतर तिने स्वतः आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. एखादी माता आपल्या पोटच्या गोळ्याचा, ज्या हाताने चिमुकलेला खाऊ पिऊ घालत होती त्याच हाताने तिचा गळा आवळण्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संताप आणि आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.  नेमकं काय घडलं ज्यामुळे मनीषाने इतकं मोठं पाऊल उचललं, यावरून सवाल उपस्थित केला जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा 125 KM पर्यंत पाठलाग, ओव्हरटेक करताना झाला घात अन्...

या प्रकरणी मृत मनीषा विरोधात आपल्याच चिमुकल्या मुलीची हत्या केल्या प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement