Solapur News: प्रेमविवाह केला, संसारात हुंड्याचा अडथळा आला, गर्भवती विवाहितेचा शेवट भयंकर झाला

विवाह झाल्यानंतर दोन वर्ष सुखी संसारात गेली. मात्र गेल्या दोन वर्षापासून आशाराणी यांना भोसले कुटुंबीयांकडून पैसे आणि चार चाकीसाठी त्रास दिला जात होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
सोलापूर:

सौरभ वाघमारे 

मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी एमआयडीसी येथे सासरच्या मंडळींच्या लोभापाई आणि छळपाई 22 वर्षीय विवाहित महिलेला गळफास घेऊन आत्महत्या करण्याची वेळ आली. पती सासू-सासरे यांनी माहेरून पैसे आणि चार चाकी घेण्यासाठी आशा राणी भोसले यांच्याकडे तगादा लावला होता. पिंपरी येथील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण ताजे असतानाच सोलापुरातून हुंड्याचा एक बळी गेल्याचं समोर आलं आहे. आशा राणी हिला तीन वर्षाची मुलगी आहे. शिवाय ती तीन महिन्याची गर्भवती होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2019 साली आशाराणी हिचे मोहोळ तालुक्यातील पवन भोसले याच्याशी विवाह झाला होता. तर तिचीच बहीण उशाराणी हिचा विवाह देखील पवन भोसले याचा भाऊ ज्ञानेश्वर सोबत झाला आहे. मागील तीन वर्षांपासून आशाराणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासासाठी माहेरहुन पैसे आण म्हणून मारहाण करतं होता. तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील तिली हिणवत होते.  स्वयंपाक नीट करता येतं नाही. मुलाला इज्जत देतं नाही असे म्हणत तिचा मानसिक छळ करतं होते. 

ट्रेंडिंग बातमी - Nashik News: संजय राऊतांचा एक फोन.. अखेर 'त्या' बड्या नेत्याची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

2024 मध्ये देखील पती पवन याने आशाराणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं. त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते. मोहोळ येथील आशाराणी भोसले प्रकरणतील तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं आहे. पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरे बलभीम भोसले या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात पवन भोसले, अलका भोसले, बलभीम भोसले या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातमी - Laxman Hake: 'पगार बुडवला, धमकी दिली, पत्नीला नोकरीचं खोटं आश्वासन', OBC नेते लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप

आशाराणी यांनी 2019 साली पवन याच्या बरोबर विवाह केला होता. विशेष म्हणजे पवन आणि आशाराणी यांचा प्रेम विवाह आहे. आशाराणी यांची बहीण उषा राणी हिचा विवाह पवन याच्या मोठ्या भावाशी झाला होता. त्याचवेळी पवन आणि अल्पवयीन असणारी आशाराणी यांनी प्रेमविवाह केला. विवाह झाल्यानंतर दोन वर्ष सुखी संसारात गेली. मात्र गेल्या दोन वर्षापासून आशाराणी यांना भोसले कुटुंबीयांकडून पैसे आणि चार चाकीसाठी त्रास दिला जात होता. त्यालाच कंटाळून आशाराणीने आपले जीवन संपवलं. त्यामुळे हुंड्यासारख्या प्रथा आजही जीव घेण्या ठरत आहे.

Advertisement