जाहिरात

Scientist Subbanna Ayyappan Death: खळबळजनक! पद्मश्री विजेत्या शास्त्रज्ञांचा कावेरी नदीत मृतदेह आढळला, 3 दिवसांपासून होते बेपत्ता

Scientist Subbanna Ayyappan Death Case: नदीत एका मृतदेहाची तरंगत असल्याची माहिती पोलिसांना लोकांकडून मिळाली होती. त्यानुसार मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण शहराजवळील कावेरी नदीत त्यांचा मृतदेह सापडला. 

Scientist Subbanna Ayyappan Death: खळबळजनक! पद्मश्री विजेत्या शास्त्रज्ञांचा कावेरी नदीत मृतदेह आढळला, 3 दिवसांपासून होते बेपत्ता

बेंगळुरु: पद्मश्री पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉ. सुबन्ना अय्यपन यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी (ICAR) अध्यक्ष असलेले शास्त्रज्ञ सुबन्ना अय्यप्पन यांचा मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण शहराजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळून आला. ते 7 मेपासून बेपत्ता होते. त्यांच्या  संशयास्पदरित्या मृत्यूच्या बातमीने खळबळ उडाली असून कर्नाटक पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन हे नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले होते मात्र ते घरी परतले नाहीत. कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध केल्यानंतर  म्हैसूरमधील विद्यारण्यपुरम पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासात अय्यप्पन यांची स्कूटी नदीकाठी आढळली होती.  त्यानंतर नदीत एका मृतदेहाची तरंगत असल्याची माहिती पोलिसांना लोकांकडून मिळाली होती. त्यानुसार मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण शहराजवळील कावेरी नदीत त्यांचा मृतदेह सापडला. 

अय्यप्पन अनेकदा कावेरी नदीच्या काठावर ध्यानासाठी जात असे. ते म्हैसूरमधील रामकृष्ण आश्रमालाही वारंवार भेट देत असत. प्राथमिक तपासात अय्यप्पन यांनी श्रीरंगपट्टणातील साई बाबा आश्रमाजवळ नदीत उडी मारुन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि पोलीस अहवालाची वाट पाहत आहेत.

नक्की वाचा - भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story

 कृषी आणि मत्स्यव्यवसाय शास्त्रज्ञ अय्यप्पन यांनी अनेक शहरांमध्ये काम केले आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, भोपाळ, भुवनेश्वर आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे. भुवनेश्वरमधील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर एक्वाकल्चर (CIFA) चे संचालक आणि मुंबईतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (CIFE) चे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.

भारतातील नीलक्रांतीचे नेतृत्व करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक संस्थांच्या उभारणी आणि संगोपनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी इंफाळमधील केंद्रीय कृषी विद्यापीठाचे (CAU) कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आहे.  अय्यप्पन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि जावई असा परिवार आहे.

Thane News: आईचा अपघाती मृत्यू, मुलीने वडिलांना कोर्टात खेचलं, 32 लाखांची भरपाई मिळाली

Listen to the latest songs, only on JioSaavn.com