
उत्तर प्रदेशातल्या अलीगडच्या सासू आणि जावयाच्या लव्ह स्टोरीने फक्त उत्तर प्रदेशातच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच ही स्टोरी आहे. मुलीच्या लग्ना आधीच सासू होणाऱ्या जावयाला घेवून पळाली. पण आपल्या लव्ह स्टोरीची चर्चा प्रत्येक चॅनेल, न्युज पेपर आणि सोशल मीडियावर होत आहे हे लक्षात आल्यानंतर बदनामी टाळण्यासाठी त्यांनी गावी परत येण्याचा निर्णय घेतला. पोलिसां समोर दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रेम प्रकरणाची इनसाइड स्टोरी सर्वां समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या दोघांनी आपली बाजून पोलिसां समोर मांडली आहे. सासू सपना कुमारीने आपल्या बरोबर का होत होतं याचं गाऱ्हाणं पोलिसां समोर मांडलं आहे. ती सपना सांगते नवरा,जितेंद्र तिला दररोज टोमणे मारत होता. शिव्या देत होता. येवढच नाही तर जावया बरोबर पळून जा असं ही सांगितलं जात होतं. मग काय, मी पण जावया बरोबर पळून गेले. अशा शब्दात सपनाने आपली बाजू पोलिसां समोर मांडली. सपना होणारा जावई राहुल बरोबर पळून गेली होती. पोलिसात तिने आपबिती सांगितली.
ट्रेंडिंग बातमी - Love story: जावया बरोबर पळून गेलेली सासू आली परत, प्रेम प्रकरणात नवा ट्वीस्ट
6 एप्रिलला ते दोघे ही घरातून पळून गेले. सपना आणि राहुल आधी अलिगडवरून कासगंज इथं पळाले. तिथून त्यांनी बरेली गाठली. तिथे त्यांनी मौजमजा केली. शहर फिरले. शेवटी त्यांनी बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे ते जावून राहू लागले. प्रेमात आंधळे झालेले सपना आणि राहुलने जेव्हा त्यांचा मोबाईल सुरु केला त्यावेळी त्यांचे डोळे उघडले. मोबाईलवर फक्त आणि फक्त त्यांच्याच बातम्या होत्या. युपी पासून दिल्ली पर्यंत प्रत्येक न्यूज चॅनेल आणि वर्तमान पत्रात त्यांच्याच बातम्या होत्या.
सासू जावयाची प्रेम कहाणी ट्रेंडींगमध्ये होती. त्यामुळे त्यांच्या मनालाही चटका लागला. नातेवाईक काय चर्चा करतील. समाजात इज्जत जाईल, लोकं काय म्हणतील, या सर्व गोष्टींनी त्यांच्या मनात घर केलं. त्याच वेळी त्यांनी घरी परत येण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी मुजफ्फरपूरवरून एक खाजगी गाडी केली. त्यानंतर ते थेट अलिगडच्या दादों पोलिस स्थानकात पोहोचले. त्यानंतर पोलिसां समोर हजर होत त्यांनी झालेली सर्व कथा रडत पोलिसांना सांगितली. सपना सांगित होती माझा पती जितेंद्र रोज दारू पितो. त्यानंतर आपल्याला मारहाण करतो. शिव्या ही देणं सुरूच होतं, असं ही तिने पोलिसांनी सांगितलं.
या सगळ्या गोष्टींना आपण कंटाळलो होतो. त्याच वेळी माझी मुलगी अनिता हीचे लग्न राहुल याच्या बरोबर ठरले. त्यानंतर राहुल बरोबर आपण बोलत होतो असं सपनाने सांगितलं. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. पतीच्या वाईट वागण्यामुळे मी ठरवलं की आपण राहुल बरोबरच नवं जिवन सुरू करूयात. त्यानंतर पळून जाण्याचा निर्णय घेतला असं तिने पोलिसां समोर स्पष्ट केलं. दरम्यान सपना आणि राहुल दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र आता यात पुढे काय होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world